१०० दिवस उदिष्ट कार्यक्रमानुसार जिल्हा जात पडताळणीसाठी विशेष मोहिम

अर्ज करण्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांचे आवाहन

बातमी शेअर करा...

अर्ज करण्याचे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांचे आवाहन

जळगावः शैक्षणीक वर्ष २०२४-२५ वर्षात १२ वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण घेत असलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणीचा अर्ज न केलेल्या मागासगवर्गीय विद्यार्थ्यांच्या जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहिम राबविण्यात येत असून अशा विदयार्थ्यांनी अर्ज दाखल करावे असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य सचिव एन. एस. रायते यांनी केले आहे.

यापूर्वी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत ३१ डिसेंबर २०२४ होती. मात्र जिल्हयातील अनेक विदयार्थ्यांनी त्यांचे अर्ज आजपर्यंत जिल्हा जात पडताळणी समिती कार्यालयात दाखल केले नाहीत अशा विदयार्थ्यांकरीता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या १०० दिवस उदिष्ठकार्यक्रमानुसार ही विशेष मोहिम राबविण्यात येत आहे.

अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग व शैक्षणीक व सामाजिकदृष्टया मागास प्रवर्ग (मराठा) या मागास प्रवर्गातील विदयार्थ्यांना जात पडताळणी करावी लागते. बारावी विज्ञाननंतर वैदयकीय, अभियांत्रीकी, आर्किटेक्चर, औषधनिर्माण, विज्ञान, कृषी, पशुसंवर्धन आदी, व्यावसायिक अभ्यासक्रमांस राखीव जागेवर प्रवेश घेण्यासाठी तसेच प्रवेश घेतल्यानंतर सरकारचा शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क प्रतिपूर्ती, योजनेचा लाभ घ्यावयाचा आहे. अशा विदयार्थ्यांना जात प्रमाणपत्राची पडताळणी करुन घेऊन जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम