२० वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू

यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना

बातमी शेअर करा...

२० वर्षीय तरुणीचा पाय घसरून विहिरीत पडल्याने मृत्यू
यावल तालुक्यातील चिंचोली येथील घटना

यावल प्रतिनिधी

बकऱ्यांची पाणी भरण्यास गेलेल्या २० वर्षीय तरुणीचा पाय घसरल्याने तीचा विहिरीत पडून मृत्यू झाल्याची घटना यावल तालुक्यातील चिंचोली येथे घडली.
याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. प्रज्ञा सुरेश साळुंखे (वय २०) असे मयत तरुणीचे नाव आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार चिंचोली ता. यावल येथील रहिवाशी प्रज्ञा ही तरुणी मंगळवारी शेत शिवारात त्यांच्या बकऱ्यांच्या गोठ्यात गेली होती. बकऱ्यांना पाणी पाजण्याकरिता ती तिच्या गोठ्यालगत असलेल्या भागवत रामचंद्र पाटील यांच्या शेतात विहिरीवर गेली. तेथे हंडा आणि बादली घेऊन ती विहिरीवरून पाणी भरत होती. दरम्यान तिचा पाय घसरला आणि ती विहिरीत पाण्यात बुडाली.

मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ती घरी परतली नाही म्हणून कुटुंबाकडून तिचा रात्री शोध घेण्यात आला. विहिरीजवळ बादली आणि हंडा मिळून आल्यामुळे त्यांनी रात्री विहिरीत डोकावून पाहिले मात्र, काही दिसले नाही तेव्हा बुधवारी सकाळपासून विहिरीत शोध घ्यायला सुरुवात केली. पोलीस पाटील राकेश साठे, सरपंच अनिल साळुंखे, ग्रामपंचायतचे सदस्य मुकेश साळुंखे, प्रशांत कोळी, प्रभाकर साळुंखे यांनी विहिरीजवळ धाव घेतली व यावल पोलिसांना माहिती देण्यात आली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम