गौतमीला शेतकरी मुलाने लिहले पत्र ; राज्यात होतेय प्रंचड व्हायरल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ एप्रिल २०२३ ।  राज्यात गौतमी पाटील प्रंचड व्हायरल होत आहे. यावर राजकारणासह सांस्कृतिक क्षेत्रातील मंडळी टीका करताना नेहमी दिसून येत आहे. पण गौतमीचा प्रत्येक कार्यक्रम मोठ्या जल्लोषात होत असला तरी सध्या एका शेतकरी मुलाने गौतमीला पत्र लिहले आहे व तेच पत्र राज्यभर व्हायरल होत आहे.
गौतमीला पत्र लिहिणाऱ्या शेतकरी मुलाचं नाव किसानपुत्र श्रीकांत गडाले असं आहे. तो बीड याठिकाणी राहतो. श्रीकांत याने फेसबूकवर पत्र पोस्ट केलं आहे. सध्या त्याची पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. शिवाय अनेकांनी शेतकरी मुलगा श्रीकांत याने लिहिलेल्या पत्रावर प्रतिक्रिया दिली आहे. पत्र लिहित श्रीकांत म्हणाला ‘तुझ्यासोबत लग्न करायला कोणीच तयार नाही’… एवढंच नाही तर, पोस्ट शेअर करत त्याने कॅप्शनमध्ये ‘गौतमी पाटीलचे हाल बेहाल…..’ असं लिहिलं आहे.

भावी जोडीदाराबद्दल काय म्हणाली गौतमी पाटील?
काही दिवसांपूर्वी गौतमीने जोडीदाराबद्दल मोठं वक्तव्य केलं आहे. आयुष्यात पती कसा हवा याबद्दल गौतमीने मोठं वक्तव्य केलं होतं. जोडीदाराबद्दल गौतमी म्हणाली, ‘मला प्रसिद्धी, प्रतिष्ठा, बंगला, पैसा. काहीही नकोय. माझ्या आयुष्यात जी परिस्थिती येईल, त्या परिस्थितीत माझी साथ देणारा जोडीदार मला हवा आहे.’ असं गौतमी म्हणाली.

गौतमीचं अभिनय क्षेत्रात पदार्पण नृत्याच्या जोरावर गौतमी मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. गौतमीचा पहिला मराठी सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. गौतमीच्या पहिल्या सिनेमाचं नाव ‘घुंगरु’ असं आहे. सिनेमाचा टीझर प्रदर्शित झाला असून चाहते सिनेमाच्या प्रतीक्षेत आहेत. गौतमी पाटील सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. गौतमीची एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची गर्दी जमलेली असते. आता गौतमी मोठ्या पडद्यावर देखील झळकणार आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम