मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरु होताच नागरिकांनी धरली वाट !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जून २०२३ ।  राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सध्या विकास कामाचा धडाका सुरु केला आहे. त्यासोबत पक्ष वाढविण्यासाठी अनेक ठिकाणी मोठमोठ्या सभा घेत आहे. पण काही ठिकाणी त्यांना यश येत नसल्याच्या चर्चा राज्यभर सुरु आहे. नुकतेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी आलेल्या नागरिकांनी परतीची वाट धरल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळाले. प्रचंड गरमी, नियोजनाचा अभाव, अपुरी बैठक व्यवस्था व नियोजित वेळ उलटूनही मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती यामुळे नागरिकांनी सरळ घरचा रस्ता धरला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमानाची नियोजित वेळ दुपारी बारा वाजताची होती मात्र दीड वाजला तरी मुख्यमंत्री न आल्याने तसेच आधीच उकाड्याला कंटाळलेल्या ब-याच नागरीकांनी मंडपातून बाहेर पडत परतीची वाट धरली. त्यानंतर दिड तासांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले, मात्र कार्यक्रम लांबल्याने आणि त्यातच गरमीने कासावीस झालेल्या नागरीकांनी मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असतानाच, मंडपातून बाहेर पडत घरची वाट धरली. बैठक व्यवस्थाही अपुरी केल्याने अनेक महिलांना खाली जमिनीवर बसावे लागले. मंडपात पुरेसे पंखे नसल्याने भर दुपारच्या गरमीने अंगातून घामाच्या धारा बाहेर पडत होत्या.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रशासना मार्फत मंगळवारी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे आयोजन कुडाळ येथील कुडाळ हायस्कूलच्या मैदानावर करण्यात आले होते. त्यासाठी वाॅटरप्रुप मंडप उभारण्यात आला होता. भर उन्हात शासनाच्या विविध योजनांचे स्टॉल्स देखील लावण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सकाळी आठ वाजल्यापासूनच जिल्हाभरातून आलेल्या नागरिकांनी गर्दी केली. मात्र, 12 वाजता मुख्यमंत्र्यांच्या आगमनाची वेळ होती. परंतू 1 वाजून गेले तरी मुख्यमंत्र्यांचा कार्यक्रमस्थळी पत्ताच नसल्याने अनेक नागरिकांनी घरची वाट धरल्याचे पाहायला मिळाले. भर उन्हात लावलेले स्टॉल आणि चार तासांहून अधिक काळ वाट पाहायला लागल्यामुळे नागरिक कंटाळल्याचे यावेळी दिसून आलं. तब्बल दिड तासांनी दुपारी 1.18 वाजता मुख्यमंत्र्यांचे कार्यक्रमस्थळी आगमन झाले. तोपर्यंत बरेच नागरीक मंडपातून बाहेर पडत घरच्या वाटेवर निघाले होते.

शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला यावेळी केंद्रीय मंत्री नारायण राणे, सा.बा.मंत्री तथा पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आ.भरत गोगावले, आ.नितेश राणे, आ.रविंद्र फाटक, माजी खासदार निलेश राणे, जिल्हाधिकारी के.मंजूलक्ष्मी, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, जिल्हा पोलिस अधीक्षक सौरभ अग्रवाल, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांच्यासह जिल्ह्य़ातील अधिकारी, पदाधिकारी उपस्थित आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम