चित्रा वाघांची संजय राऊतांवर जोरदार हल्लाबोल म्हणाले…बाहेर आले !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ जानेवारी २०२३ । राज्यातील ठाकरे व शिंदे गटात रोज सुरु असलेली आरोप – प्रत्यारोपात कुणीही मागे नाही. “महाराष्ट्रात मिंधे-फडणवीसांचे खोके सरकार आल्यापासून जादूटोणा, करणी, टाचण्या, लिंबू-मिरची वगैरे अंधश्रद्धांना उभारी मिळताना दिसत आहे व सध्या याच विषयांची चर्चा मंत्रालयात व इतर सरकारी कार्यालयात होत असल्याची टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे तर त्याला प्रतिउत्तर म्हणून भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राऊतांना दिले आहे.

चित्रा वाघ म्हणाले कि, “कार्यकारी संपादक जेव्हापासून बाहेर आले, तेव्हापासून त्यांचे मनस्वास्थ ठीक नाही. हे आता त्यांच्या कृतीतून आणि लेखणीतून जाणवू लागलं आहे. त्यामुळे यावर जास्त बोलण्यात अर्थ नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथे कोणत्याही अंधश्रद्धेला थारा नाही. हे महाराष्ट्रातला प्रत्येक जण जाणतो”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. चित्रा वाघ सध्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारीणीच्या बैठकीसाठी दिल्लीत आहेत.

यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राऊतांवर शाब्दिक हल्लाबोल केला आहे. “निवडणूक आयोगाचा जो निकाल असेल तो सर्वांना मान्य करावा लागेल. आज याबाबत स्पष्टता येईल, अशी अपेक्षा आहे”, असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत. दरम्यान, “शिंद्यांचे जादूटोणा सरकार सत्तेवर आल्यापासून राजकीय विरोधकांचे अपघात व घातपाताचे प्रमाण अचानक वाढू लागले आहे. याचा संबंध लोक सरकारपुरस्कृत जादूटोण्याशी जोडत असतील तर ते बरे नाही”, असा टोलाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संजय राऊतांनी सामनामधून लगावला होता.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम