लाठीचार्जचे राजकारण करू नका ; बावणकुळे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १२ जून २०२३ ।  राज्याला धार्मिक परंपरा लाभली असतांना नुकतेच आळंदी येथे पोलिसांनी वारकरीवर केल्या लाठीचार्जचा मुद्यावर विरोधकांनी सरकारला चांगलेच घेरले असतांना भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी यावर भाष्य केले आहे.

या सर्व घडामोडी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावणकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रीया देताना म्हणाले कि, काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितले होते की, या प्रकरणाचे राजकारण करू नका. जी घटना घडली त्याबाबत सविस्तर माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मलाही वाटतं की, विरोधकांनी या प्रकरणाचे राजकारण करू नये असं बावणकुळे म्हणालेत. पुढे बोलताना बावणकुळे म्हणाले की, उद्धव ठाकरे यांच्या काळातही अशी मोठी घटना घडली होती. तर या घटनेबाबत चर्चा करून योग्य तो निर्णय घेतला आहे. याठिकाणी लाठीचार्ज झाला नाही. तुम्हाला सीसीटीव्हीमध्ये कुठेही लाठीचार्ज झाल्याचे दिसून येत नाही. याउलट पोलिसांवर तेथील लोकांनी पाय दिल्याचे दिसून येतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम