मायक्रोवेव्हमधील अन्न सेवन केल्यास होवू शकतो गंभीर आजार !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २७ नोव्हेबर २०२२ । पूर्वीचे लोक अन्न गरम करून जेवण करीत असे ते कोणत्या मानवनिर्मित वस्तूचे वापर करीत नसल्याने त्यांचे आरोग्यात कुठलीही बाधा येत नाही. थंडीच्या दिवसात लोकांना गरम अन्न खायला आवडते. मात्र वेळ आणि गॅस या दोहोंची बचत व्हावी या हेतूने आजकाल बरेच जण अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव्हचा वापर करू लागले आहेत. गेल्या काही काळापासून मायक्रोवेव्ह हा लोकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. आजकाल अन्न शिजवण्यापासून ते अन्न गरम करण्यापर्यंत मायक्रोवेव्ह सहज वापर केला जातो. त्याशिवाय ऑफीसमध्ये बरेच जण दुपारी जेवण गरम करण्यासाठी मायक्रोवेव्ह वापरतात. मात्र मायक्रोवेव्ह मध्ये गरम केलेले अन्न तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकते, हे तुम्हाला माहीत आहे का?

रोगप्रतिकारक शक्तीवर होतो वाईट परिणाम
आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यात अन्नाची भूमिका खूप महत्त्वाची असते. अन्न खाल्ल्याने रोगप्रतिकारशक्ती तर मजबूत होतेच, त्याशिवाय आपल्याला ऊर्जाही मिळते. पण जेव्हा आपण मायक्रोवेव्हमध्ये शिजवलेले किंवा गरम केलेले अन्न खातो, तेव्हा त्याचा आपल्या प्रतिकारशक्तीवर खूप वाईट परिणाम होतो. खरं तर, अन्नाच्या आत असलेल्या रोगप्रतिकारशक्ती वाढवणाऱ्या जीवाणूंचा मायक्रोवेव्हमुळे नाश होतो.

गर्भवती महिला आणि बाळासाठी हानिकारक
तसं पहायला गेलं तर मायक्रोवेव्हधील अन्न हे सर्वांसाठीच हानिकारक असतं. पण तुम्ही गरोदर असाल तर मायक्रोवेव्हमधील अन्न बिलकूल खाऊ नका. मायक्रोवेव्हमध्ये अन्न शिजवाताना किंवा ते गरम करताना त्यातील (मायक्रोवेव्हमधील) इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनचा अन्नावर परिणाम होतो. त्यामुळे हे खाल्यास गरोदर महिला व तिच्या बाळाचेही नुकसान होऊ शकतो. गर्भपाताची शक्यताही वाढते.

लवकर येते वृद्धत्व
मायक्रोवेव्हमधील खाद्यपदार्थ अगदी लवकर शिजतात. मायक्रोवेव्हमध्ये असलेल्या किरणांचा अन्नपदार्थांवर मोठा प्रभाव पडतो, ज्याचा आपल्या त्वचेवर घातक परिणाम होतो आणि वेळेपूर्वीच सुरकुत्या येऊ लागतात. त्यामुळे शरीरावर लवकर वृद्धत्वाच्या खुणा दिसू लागतात.

अन्न खराब होते
एकदा अन्नपदार्थ तयार केल्यानंतर तो वारंवार गरम केल्यास त्यातील पोषणमूल्य नष्ट होते. मात्र मायक्रोवेव्हच्या बाबतीत हे आणखनीच हानिकारक आहे. वास्तविक, मायक्रोवेव्हमध्ये अन्न गरम केल्याने अन्नाचे पोषणमूल्य दुप्पट वेगाने कमी होते. अशा परिस्थितीत विघटनापासून (अन्नाचे) संरक्षण करणारे घटक नष्ट होतात, ज्यामुळे अन्न खराब होऊ लागते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम