इर्शालवाडीच्या संकटात ‘लाल बागचा राजा’ आला धावून !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ ।  राज्यातील कोकणात गेल्या अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस बरसत असल्याने रायगडमधील खालापूर तालुक्यातील इर्शालवाडी गावात बुधवारी रात्री भूस्खलन झाल्याचा प्रकार समोर आला. या दुर्घटनेत गावातील २५ ते ३५ घरे माती आणि दगडांच्या ढिगाऱ्याखाली गाडली गेली. या घटनेत आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून अद्याप १०० ते १५० लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. घटनास्थळी अजूनही बचावकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र सततचा पाऊस आणि खराब हवामानामुखे काल रात्री बचावकार्य थांबवण्यात आलं. त्यानंतर आज पहाटे ५ वाजेपासून पुन्हा हे काम सुरू करण्यात आलं आहे. या संकटाच्या काळात इर्शाळवाडी येथील दुर्घटनाग्रस्तांच्या मदतीला मुंबईतील प्रसिद्ध गणपती मंडळ लालबागचा राजा धावून आले आहे. महिला, पुरुष आणि लहान मुलांचे सर्व अत्यावश्यक कपडे, खाण्यासाठी सुका खाऊ, अन्नपदार्थ, ग्रामस्थांसाठी तसेच मदतकार्य करणाऱ्या प्रशासनाच्या सर्व कर्मचाऱ्यांसाठी लागणाऱ्या सर्व जीवनाश्यक पदार्थ आणि वस्तूंची मदत मंडळाकडून करण्यात येणार आहे. शुक्रवारी सकाळी १० वाजता ही मदत लालबागचा राजा मुख्य प्रवेशद्वार येथून इर्शाळवाडीकडे रवाना केली जाणार आहे. दरम्यान इर्शाळवाड येथे सध्या एनडीआरएफच्या बचाव पथकासोबत पनवेल महापालिकेचे बचाव पथक, सिडकोचे मजूर आणि स्थानिक ट्रेकर्सचा एक गटही मदतकार्य करत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम