रात्रीच्या आहारात भात खाणे योग्य कि अयोग्य ?

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ३ जून २०२३ ।  अनेक लोक आपल्या नियमित आहारात भात खात असतात. काहीना तर याची सवय झालेली असते. पण हा भात कधी व किती खावा याच्यावर देखील मर्यादा असते. भात खाण्यापासून शरीराला अनेक फायदे होतात. जसं की भारतात फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे ते पचायलाही सोपे असते. तांदूळ हे धान्य प्रतीने आणि कार्बोदकांचा एक चांगला स्त्रोत आहे त्यामुळे ते मसल्स बनवण्यासाठी खाल्ले जाऊ शकते.

भात खाण्याची योग्य वेळ कोणती?
काही हेल्थ एक्सपर्ट दुपारच्या वेळेला भात खाण्याचा सल्ला देतात, कारण भात हे प्रोटीन आणि कार्बोधक देते ज्याची दिवसभर शरीराला गरज असते. मात्र रात्रीच्या वेळी भात खाणे आरोग्यास चांगले नाही जे काही लोकांसाठी धोकादायक ठरू शकते.

डायबिटीस असलेले रूग्ण
हार्वर्ड. टी. एच. चैन तांदळाचे उच्च ग्लायसेमिक अन्न म्हणून वर्णन करतात. भात हा पदार्थ पचायला सोपा असतो पण तो शरीरातील रक्तातील साखरेची झपाट्याने वाढ करतात. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. तर ज्यांना आधीपासूनच डायबिटीसचा त्रास आहे अशा लोकांनी रात्रीच्या वेळी भात खाऊ नये.

हृदयरोग असलेल्यांनी खाऊ नये भात
भातामुळे मेटाबोलिक सिंड्रोमचा धोका वाढतो. कारण या आजारांमध्ये हाय ब्लड शुगर सोबत हाय बीपी, हाय ट्रायग्लिसराईड आणि चांगले कोलेस्टेरॉल कमी होते. या अनेक समस्यांमुळे हृदयाचे नुकसान होऊन हृदयविकाराची समस्या निर्माण होते.

लठ्ठपणाला निमंत्रण
जर तुम्हाला फिट राहायचं असेल आणि वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर रात्रीच्या वेळी भात खाऊ नये. कारण भात रात्रीच्या वेळी कार्बोहायड्रेट आणि कॅलरीज देते जे रात्री शरीरात सक्षम होत नाही. त्यामुळे शरीरातील चरबी साठून राहते त्यामुळे लोकांनी लठ्ठपणा येऊ नये म्हणून भात खाऊ नये.

कॅन्सरचा धोका
देशात ज्या ठिकाणी भात पिकवला जातो ती ठिकाणं आर्सेनिकमुळे दूषित होतात. त्यामुळे हे घटक शरीरात पोहोचल्यास कर्करोगाचा धोका निर्माण होतो तसंच मेंदूचे कार्यही कमी होऊ शकते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम