याला तुरुगांत टाकेल, नाव न घेता पवारांचा टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ जानेवारी २०२३ राज्यातील नेते व अभिनेत्यामध्ये सुरु असलेला सामना आता चांगलाच रंगात येत आहे तर दुसरीकडे शरद पवार व देवेद्र फडणवीस यांच्यात हि वाक्ययुद्ध सुरु आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आणि भाजप नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यांत कलगीतुरा रंगला. कोण जमिनीवर आणि कोण हवेत यावरुन दोघांना एकमेकांवर भाष्य केले. माध्यमांशी बोलतांना शरद पवार म्हणाले की, सत्ता असल्यावर जमिनीवर पाय ठेवून राहायचे असते. याला तुरुगांत टाकेल, त्याला तुरुंगात टाकेल, याचा जमीन रद्द करेल असे विधान करणे सत्ताधारी नेत्यांचे काम नाही. सध्याच्या राजकारणात काही लोकांनी टोकाला जाण्याची भूमिका घेतली असल्याचा आरोप शरद पवार यांनी कोणाचे नाव न घेता केला.

फडणवीस म्हणाले कि, : शरद पवार यांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आम्हाला आमची जमीन माहीत आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोकं आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असे वाटते की, नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी त्यांनी करायला हवी.

शरद पवार यांनी सीमावादाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिले. महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाबाबत कुठलेही शंका घेण्याचे कारण नाही. सीमावादाबाबत सरकार खूप गंभीर आहे.यासाठी हरिष साळवे यांची नियुक्ती आम्ही करणार आहोत. त्यांचाशी संपर्क साधला गेला आहे. तेही देखील आपल्या बाजूने उभे राहतील अशी अपेक्षा आहे. त्यामुळे न्यायालयात आपली बाजू मजबूत असल्याचं फडणवीस म्हणाले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम