दै. बातमीदार । ६ जानेवारी २०२३ सततच्या कामामुळे अनेक लोक शहरात एकटे राहतात. त्यामुळे त्यांची एकटेपणाची भावना वाढते आणि तणावही येतो. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरी कुत्रा, मांजर किंवा ससा यांसारखे पाळीव प्राणी आणू शकता. त्यांच्यामुळे मिळणारे फायदे जाणून घेऊया.
निरोगी रक्तदाब
सर्व पाळीव प्राणी मालकांसाठी ही चांगली बातमी आहे. अनेक आरोग्य अहवाल असे सूचित करतात की पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्यामुळे हृदयाचे आरोग्य वाढवू शकते. पाळीव प्राण्यांसोबत राहिल्याने मानसिक ताण कमी होतो, ज्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो. यामुळे हृदयाशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होऊ शकतो.
शारीरिक हालचाल वाढते
पाळीव प्राणी खूप सक्रिय असतात, त्यामुळे आपल्या दैनंदिन शारीरिक हालचालींना प्रोत्साहन मिळते. तंदुरुस्त आणि निरोगी राहण्यासाठी शारीरिक हालचाली करणे खूप महत्वाचे आहे, यासाठी पाळीव प्राणी हा सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो.
एकटेपणा होतो दूर
जे लोक कामानिमित्त घरापासून आणि कुटुंबापासून दूर राहतात त्यांच्यासाठी पाळीव प्राणी घरी ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. घरात कोणतेही पाळीव प्राणी असल्यास मानसिक आरोग्य चांगले राहते आणि एकटेपणा जाणवत नाही.
शरीरातील हॅपी हार्मोन्स वाढतात
एका अहवालानुसार, पाळीव प्राण्यांच्या आसपास राहिल्याने शरीरातील कोर्टिसोल या स्ट्रेस हार्मोनचे उत्पादन कमी होते. आणि ऑक्सीटॉसिन व एंड्रोफिन या हॅपी हार्मोन्सचे उत्पादन वाढते. कुत्रा किंवा मांजरीसोबत राहण्यामुळे तणाव, चिंता, डिप्रेशन (नैराश्य) आणि एकटेपणा दूर होतो.
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम