
दै. बातमीदार । १२ जानेवारी २०२३ । ‘भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ या विषयावर आधारित गाथा स्वातंत्र्याची : साहित्य, संस्कृती आणि कलेच्या महोत्सवात काशिनाथ पलोड विद्यालयाच्या वतीने ‘‘गाथा स्वातंत्र्याची भाग २’ या महानाट्याच्या दुसऱ्या पर्वात भारतीय स्वातंत्र्याचा १९४७ ते १९९० या कालखंडातील यशोगाथेचे सादरीकरण नृत्य, गीत, संगीत आणि कथेच्या स्वरूपात करण्यात आले. या महानाट्य मधून आपल्या या महान देशाचा स्वर्णिम आणि गौरवपूर्ण इतिहास आजच्या नवपिढीला कळावा असा होता. या महानाट्यास प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे जिल्हाधिकारी अमन मित्तल यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक धनंजय जकातदार यांनी केले आपल्या प्रास्ताविकेतून या आयोजना मागील मुख्य भूमिका मांडली तर जिल्हाधिकारी श्री.अमनजी मित्तल यांनी उपस्थित सर्व जनतेला संबोधित करत या देशभक्तीपर ओतप्रोत महोत्सवास शुभेच्छा दिल्या.
महानाट्याची सुरवात भारतीय स्वातंत्र्याच्या गौरवपूर्ण क्षणाने झाली तर स्वराज्य संस्थानांचेच विलीनीकरण, गांधीजींचा मृत्यु, संविधान दिन, प्रजासत्ताक दिन, स्वतंत्र भारताची पहिली निवडणूक, महाराष्ट्र राज्याची निर्मिती, FTII ची स्थापना, हरितक्रांती, गोवा मुक्ती संग्राम, NCERT, NID, हुंडा बंदी कायदा, औद्योगिक विकास, पहिली ओपन हार्ट सर्जरी, भारताची अण्वस्त्र आणि अंतरीक्ष क्षेत्रातील भरारी, टेलेक्स सुविधा, समाज कल्याण विभागाची स्थापना, साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च ज्ञानपीठ पुरस्काराची स्थापना, ताश्कंद करार, भारताची पहिली विश्व सुंदरी, पंतप्रधान, अणुशक्ती केंद्राची स्थापना, पहिला स्वदेशी संगणक, भारत पाक युद्ध आदी महत्वाच्या घटनांवर प्रकाश टाकण्यात आला असून यात एकूण १००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
या प्रसंगी काशिनाथ पलोड विद्यालयाचे माजी विद्यार्थी चिन्मय नंदकिशोर सागडे, केशव स्मृति प्रतिष्ठानचे संचालक डॉ. राजेश डाबी, केशव स्मृति प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरतदादा अमळकर, शालेय समिति अध्यक्ष. श्री.धनंजय जकातदार विवेकानंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा श्रीमती. शोभाताई पाटील, सहसचिव श्री.विनोद पाटील, कोषाध्यक्ष सौ.पल्लवी मयूर, सौ. विद्या चौधरी, प्रा.डॉ.विजेता सिंग, सौ.वैदेही नाखरे, विद्यालयाचे प्रशासन अधिकारी श्री. मिलिंद पुराणिक, मुख्याध्यापक सौ. संगिता तळेले आदी मान्यवर देखील उपस्थित होते. सर्व विद्यार्थी, पालक आणि जळगाव शहरातील गणमान्य व्यक्ती आणि नागरिकांच्या उपस्थितीत या दिमाखदार सोहळ्याचा समारोप करण्यात आला. महानाट्याच्या या दुसऱ्या पुष्पाचे सूत्रसंचालन मोनाली पाटील यांनी तर आभार प्रदर्शन संगीता तळेले यांनी केले. या महानाट्याचे समारोपीय अंतिम पुष्प उद्या सादर करण्यात येईल तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या नेत्रदीपक प्रसंगात सहभागी व्हावे असे. आवाहन विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम