आरबीआयने ‘या’ बँकेला दिला लाखो रुपयांचा दंड !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ मे २०२३ ।  देशातील प्रत्येक बँकेवर नियंत्रण असलेली बँक म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने या बँकेने आता पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे. मिझोराम ग्रामीण बँक आणि त्रिपुरा ग्रामीण बँकेला लाखोंचा दंड ठोठावला आहे. यावेळी सेंट्रल बँकेने मणिपूर ग्रामीण बँकेला बँकिंग नियमांचे पालन न केल्यामुळे 10,000 रुपयांचा दंड ठोठावला आहे. आरबीआयने मंगळवारी ही माहिती दिली. यापूर्वी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने कारवाई करताना अनेक बँकांना दंड ठोठावला आहे.

16 मे रोजी RBI ने अहवाल दिल्यानुसार IRAC नियमांनुसार काही कर्ज खाती नॉन-परफॉर्मिंग म्हणून वर्गीकृत करण्यात बँक अयशस्वी ठरली आहे. त्यानंतर सेंट्रल बँकेने कारणे दाखवा नोटीस बजावली होती, ज्यामध्ये त्यांना दंड का ? लावू नये, अशी विचारणा करण्यात आली होती.

नोटिशीला बँकेचा प्रतिसाद विचारात घेतल्यानंतर आणि वैयक्तिक सुनावणी दरम्यान केलेल्या अतिरिक्त आणि तोंडी सबमिशन लक्षात घेतल्यानंतर, RBI ने मणिपूर ग्रामीण बँकेवर दंड आकारण्याचा निर्णय घेतला. अशाच कारणांमुळे मिझोराम ग्रामीण बँकेला 5 लाख रुपये आणि त्रिपुरा ग्रामीण बँकेला 2 लाख रुपये दंड ठोठावण्यात आला होता. आणि काही दिवसांपूर्वी केंद्रीय बँकेने कॅनरा बँकेला 2.92 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. बँकिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल आरबीआय नेहमीच कठोर पावले उचलते. या निर्णयाचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम