
पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचे वक्तव्य !
दै. बातमीदार । २८ जानेवारी २०२३ । राज्यात दोन दिवसापूर्वी देवेद्र फडणवीस व अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शपथविधीमागे पवार असल्याचा दावा केला होता. महाराष्ट्रातील राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी ही खेळी खेळण्यात आल्याचे ते म्हणाले होते. त्यांच्या या दाव्यावर आता स्वतः शरद पवारांनी भाष्य केले आहे. पहाटेच्या शपथविधीला आता २ वर्षे लोटलेत. त्यामुळे तो प्रश्न आता कशाला काढायचा?, असे ते शनिवारी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणालेत.
देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांचा 3 वर्षांपूर्वी राजभवनात पहाटेच्यावेळी शपथविधी झाला होता. ही शरद पवारांची खेळी असू शकते. त्यावेळी महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. शपथविधीची ही खेळी ही कुणीतरी जाणिवपूर्वक खेळली असे म्हणता येणार नाही. पण त्यामुळे राज्यात लागू असलेली राष्ट्रपती राजवट मागे घेण्यास मदत झाली. त्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात आणखी मजबूत झाली, असे जयंत पाटील म्हणाले होते.
जयंत पाटील यांच्या या विधानावर शरद पवारांनी विस्तृत प्रतिक्रिया दिली नाही. त्यांनी केवळ या घटनेला 2 वर्षे झाल्यामुळे त्यावर आता प्रश्न कशाला अशी संक्षिप्त प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी वंचित बहुजान आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या विधानावरही भाष्य केले. ते म्हणाले – वंचित बहुजन आघाडी सोबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. आम्ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत एकत्र आहोत. त्यामुळे निवडणुकीला आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच सामोरे जाऊ.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम