शिंदे-फडणवीस राज्याला न्याय देताय ; ठाकरेंना मारले टोमणे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ जून २०२३ ।  राज्यातील भाजप व ठाकरे गटाच्या नेत्यांचे एकमेकाविरुद्ध आरोप प्रत्यारोप नियमित सुरु आहे. तर आता भाजपचे नेते नारायण राणे यांनी थेट माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

राणे म्हणाले कि, तेव्हा शिवसनेत असताना आम्ही मराठी माणसांच्या हितासाठी आणि कोकणच्या विकासाची काम केली. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब गेल्यानंतर ठाकरे सेनेने मराठी माणसाला देशोधडीला लावले; मात्र आता शिवसेना आणि भाजप युतीचे शिंदे-फडणवीस सरकार आले आहे. तुमचे अधिकार देण्यासाठी, तुम्हाला योजनांचा लाभ देण्यासाठी ते तुमच्या दारी आले आहेत. हक्काने हाक मारा, मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यंत्री फडणवीस तुमच्या हाकेला ओ देवून मदतीला धावतील. प्रत्येकाला न्याय देतील, असा विश्वास केद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी येथे व्यक्त केला.

ते म्हणाले, ‘‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शासन आपल्या दारी हा उपक्रम स्तुत्य आहे. आज जनजीवन, पायभूत सुविधा, आरोग्य व्यवस्था, रोजगार, नोकरी अशा कोणत्या अपेक्षा आहेत हे विचारण्यासाठी आणि त्या पूर्ण करण्यासाठी आले आहेत. मुख्यमंत्री शिंदे-फडणवीस यांच्यामुळे जनतेचे राज्य आले असे वाटू लागले. कारण ते जनतेमध्ये सामील होतात.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम