![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2023/01/Batmidar-8-10.jpg)
ते सरकार पाठीत खंजीर खूपसून आले होते ; उपमुख्यमंत्री फडणवीसांची घणाघाती टीका
दै. बातमीदार । ११ जानेवारी २०२३ । राज्यात मागचे सरकार अनैतिक होते. जनादेशाचा विश्वासघात व आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी एक मोठा उठाव केला. तो फक्त हिंदुत्व आणि बाळासाहेबांच्या विचारांसाठीच होता. असा टोलाचा उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी महाविकास आघाडीला लगावला आहे. आज नागपूर येथे ते बोलत होते. पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीची घोषणा आज नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. यावेळी त्यांनी डाॅ. रणजित पाटील यांचे नाव उमेदवारीसाठी घोषित केले. यावेळी त्यांनी संबोधन केले.
फडणवीस म्हणाले कि, वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले, तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला. मागचे सरकार अनैतिक सरकार होते. आपल्या पाठीत खंजीर खूपसून ते सरकार आले होते. आपल्या सरकारला सहा महिने झाले. या काळात सरकार काय असते हे जनतेला कळाले. आधीचे सरकार अडीच वर्षे बंदीस्त होते. ते दाराआड होते. ते केवळ फेसबूकवर लाईव्ह होते तर जनतेत डेड होते. सरकारचे काहीच दिसत नव्हते. दिसायची ती वसूली. वसूलीचे नवीन उच्चांक गेल्या सरकारने गाठले. मंत्र्यापासून अधिकाऱ्यांपर्यंत जेलमध्ये गेले.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, वर्क फ्राॅम होम आपण बघितले परंतु त्यानंतर वर्क फ्राॅम जेल हा प्रकार महाराष्ट्राला जेल दिसला तो त्या सरकारमध्ये होता. मंत्री जेलमध्ये गेले तेव्हा मुख्यमंत्र्यात हिंमत नव्हती की, त्या मंत्र्यांचा राजीनामा घ्यावा. सरकार बदलून मंत्रीच बदलावे लागले तेव्हा जेलमधील मंत्र्याचा कारभार बंद झाला.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम