
या प्रश्नाची मोदी सरकारने उत्तर द्यावी ; संजय राऊतांचा हल्लाबोल !
दै. बातमीदार । ३१ मे २०२३ । देशातील मोदी सरकारला नुकतेच ९ वर्ष पूर्ण झाली असून यात पहिली पाच वर्षे आणि आताची चार वर्षे. त्यामुळे भाजपकडून पुन्हा लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली. मात्र, मागच्या नऊ वर्षात आपण जनतेला काय दिले? यासंदर्भात मोदींनी पत्रकारपरिषद घेऊन माहिती द्यावी. देशाचे पंतप्रधान मात्र देशातील मनातील प्रश्नांना उत्तर का देत नाहीत. ते स्वतःशीच बोलतात. लोकांच्या मनात काय आहे. यावर ते कधी बोलणार आहेत का? असा सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबई महापालिका असो किंवा अन्य कोणत्याठी ठिकाणी जेपी नड्डांपासून सर्व भाजप नेते म्हणतात. की, आम्ही भाजपचा झेंडा फडकावू. मात्र, भाजपचा झेंडा हा मराठी माणसांचा झेंडा असूच शकत नाही. तो व्यापाऱ्यांचा आणि शेटजींचा झेंडा आहे. मग शिवसेना म्हणून त्यांच्यासोबत गेलेले मिंदे गटाचे लोक का गप्प आहेत. अर्थव्यवस्था का फसली, डॉलरच्या तुलनेत रुपया का पडतो. एअर इंडिया, एलआयसी सारख्या संस्था काय विकाव्या लागत आहेत. याचे उत्तर जनतेला हवे. या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी कधी देणार हा प्रश्न आहे.
शिंदे गटात गेलेल्या आमदारांना भाजपच्या तिकीटावर निडणणूक लढवावी लागणार आहे. त्यामुळे त्यांची कोंडी होत आहेत. त्यामुळे हे सर्व लोक पुन्हा ठाकरेंकडे येतील, असे विधान त्यांनी केले. यावर संजय राऊत म्हणाले की, जयंत पाटील हे ज्येष्ठ नेते आहेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष आहेत. जयंत पाटील हे सत्य बोलले. प्रत्येकाला पूर्ण खात्री आहे, मिंदे गटात गेलेले आमदार खासदार भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवावी लागेल. त्यामुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम