हे सरकार आंधळ, बहिर ; छगन भुजबळ यांचा घणाघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ डिसेंबर २०२२ । महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उध्वव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेक नेत्यांनी शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार आंधळ, बहिर, मुक आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

महागाई, बेरोजगारी, पळविलेले उद्योगधंदे, महापुरुषांचा होत असलेला अवमान असे विविध प्रश्न हाती घेत महाराष्ट्र द्रोह्यांच्या विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता. या महामोर्चात नाशिकहून तयार केलेल्या महापुरुषांच्या चित्ररथांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. या आंदोलनात छगन भुजबळ यांनी अग्रभागी सहभागी होत सरकार विरोधात हल्लाबोल केला.

छगन भुजबळ यांनी सकाळी 10 वाजेच्या सुमारास नागपाडा येथे मोर्चा स्थळी नियोजनाची पाहणी करत सहभागी मोर्चेकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर मोर्चात सहभाग घेतला. यावेळी माध्यमांना प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, राज्यात रोजगार देणारे उद्योग पळविले जात आहे. सीमा प्रश्नावर नको ते प्रश्न उपस्थित करून महाराष्ट्रातील गावांवर हक्क सांगितला जात आहे. राज्यात बेरोजगारी महागाई प्रचंड वाढत आहे. तसेच दररोज महापुरुषांचा अपमान केला जात आहे. त्यावर सरकार गप्प बसले आहे. हे सरकार सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट असल्याचा हल्लाबोल छगन भुजबळ यांनी केला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम