महाविकास आघाडी म्हणून जिंकायचे ; संजय राऊत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ४ फेब्रुवारी २०२३ । महाविकास आघाडी म्हणून जिंकायचे आहे हे ठरल्यावर शिवसेनेने त्यागाची भूमिका ठेवली. नुकत्याच लागलेल्या निकालात समोर आले आहे की, 5 पैकी 4 जागा मविआकडे आहेत. अमरावती आणि नागपूर या दोन जागा आम्ही एकीमुळे जिंकू शकलो. कसबा-चिंचवड आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच लढू असे ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज सांगतिले.

राऊत पुढे म्हणाले कि, उद्धव ठाकरे गाफिल नव्हते. त्यांना विश्वासू लोकांनी धोका दिला. आम्हालाही या बंडाचा सुगावा लागला होता. रात्रीच्या अंधारात लपुनछपून काही लोक भेटत होते. दिल्लीत मोठ्या हालचाली सुरु होत्या. चिंचवडच्या जागेसाठी शिवसेनेचा आग्रह आहे. मात्र कसबा व चिंचवड या दोन्ही ठिकाणी कोणाचे निवडून येण्याचे चान्सेस जास्त आहेत. त्यानुसार निर्णय घेतला जाईल. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद, रस्सीखेच नाही. महाविकास आघाडीने जिंकणे हे एकमेव ध्येय आहे. कसबा, पिंपरी, चिंचवड याठिकाणी आम्ही त्याच स्पिरीटने लढू. भाजपच्या शक्तीप्रदर्शनावर टीका करताना संजय राऊत म्हणाले, शक्तीप्रदर्शनाने देवी पावत नाही. कोकणाकल्या भराडी देवीने शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिवसेनेचा जन्म तळकोकणातून झालाय. भराडी देवीचे मांगल्य आम्हाला ठाऊक आहे. पैशाचे खेळ करुन देवस्थाने ताब्यात घेता येत नाही. असा टोला राऊत यांनी भाजपला लगावला. अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यावर बोलताना संजय राऊत म्हणाले, अजित पवार यांचे म्हणणे त्यांनी वारंवार आमच्याकडे सांगितले आहे. गाफिल राहिले म्हणण्यापेक्षा उद्धव ठाकरेंना विश्वासू लोकांनी धोका दिला. त्यावेळी आम्हालाही बंडाचा सुगावा लागला होता. मात्र आपल्या लोकांवर अविश्वास दाखवायला नको. असे उद्धव ठाकरे यांचे म्हणणे होते. असेही राऊत यांनी स्पष्ट केले.

आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना केलेल्या आव्हानाविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, 32 वर्षांचा तरुण आदित्य ठाकरे तुम्हाला आव्हान देत असेल तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते स्विकारावे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतःला क्रांतिकारी म्हणतात. फार मोठी क्रांती केली असे म्हणता. तर क्रांतिकारकांनी घाबरायचे नसते. निडरपणे सामोरे जायचे असते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम