
उर्फी जावेदने भाजप नेत्या वाघ यांना डिवचल..आता गप्प का ?
दै. बातमीदार । ७ जानेवारी २०२३ राज्यात भाजप व राष्ट्रवादीच्या महिला नेत्यामध्ये दोन दिवसापासून अभिनेत्री उर्फी जावेदवरून एकमेकावर टीका करीत आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी भाजप नेत्या वाघ यांना महिला आयोगाची नोटीस दिल्यानंतर वाघ यांनी प्रतिक्रिया न आल्याने अभिनेत्री उर्फीने नेत्या चित्रा वाघ यांना पुन्हा डिवचल आहे.
भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीची पोलिसांत आणि महिला आयोगाकडे तक्रार देखील केली होती. यावर उर्फीने देखील त्यांना सडेतोड उत्तर दिली आहेत. त्यांच्यातील हा वाद आता चित्रा वाघ, उर्फी जावेद यांच्यापुरताच न राहता त्यामध्ये आता महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचाही समावेश झाला आहे. अशातच आता उर्फीने भाजपच्या एका महिला नेत्याने पक्ष सोडला त्या बातमीचा स्क्रीनशॉट शेअर करत चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. भाजपच्या तामिळनाडू राज्यातील नेत्या आणि अभिनेत्री गायत्री रघुराम यांनी भाजप पक्षाला रामराम केला आहे. गायत्री यांनी सांगितले की, भाजप पार्टी महिला सुरक्षित नाहीत,म्हणून मी पार्टी सोडत आहे असं कारण त्यांनी पक्ष सोडताना दिलं आहे.
उर्फी जावेदने त्यांची ही बातमी तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर करत चित्रा वाघ यांना प्रश्न विचारला आहे. उर्फीने लिहिले आहे की, ‘आता चित्रा वाघ गप्प का आहेत! यांचे तर कपडे सुद्धा चांगले आहेत. तुमच्याच पार्टीतील लोकांमुळे हे झाले आहे! जिथे आवाज उठवायला हवा तिथे आवाज नाही उठवणार’ असं म्हणत तिने पुन्हा एकदा चित्रा वाघ यांना डिवचलं आहे. राज्यात चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यावतील वाद चांगलाच रंगू लागला आहे. अनेकजण म्हणत आहेत की चित्रा वाघ यांनी चुकीच्या मुलीशी पंगा घेतला आहे. चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडे देखील उर्फीवर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु उर्फीने तिला विनाकारण त्रास देत असल्याचे म्हणत महिला आयोगाकडे दाद मागितली. चित्रा वाघ यांना महिला आयोगाने समर्थ दिले नाही. त्याउलट चित्रा वाघ यांना महिला आयोगाकडून नोटिस देण्यात आली आहे.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम