
खारघर प्रकरण शिंदे सरकारला भोवणार ?
दै. बातमीदार । ८ जून २०२३ । राज्यात भर उन्हाळ्यात खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ात उष्माघातामुळे 14 श्रीसदस्यांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रशासन कारणीभूत आहे. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश द्या, अशी मागणी करणाऱया फौजदारी जनहित याचिकेची बुधवारी उच्च न्यायालयाने गंभीर दखल घेतली. तसेच याचिकेवर 12 जूनला पूर्ण सुनावणी घेण्याचे निश्तित केले. त्यामुळे मिंधे सरकारच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.
राज्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतरही मिंधे सरकारने 16 एप्रिलला राजकीय श्रेयासाठी खारघरच्या सेंट्रल पार्क मैदानावर ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार सोहळय़ात 10 लाखांहून अधिक श्रीसदस्यांना एकत्र जमवले होते. त्यांना रखरखत्या उन्हात सलग सात ते आठ तास बसवून त्यांच्या जिवाशी खेळ केला, असा आरोप करीत सामाजिक कार्यकर्त्या शैला पंठे यांनी उच्च न्यायालयात फौजदारी जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेवर बुधवारी प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती संदीप मारणे यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. यावेळी याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. नितीन सातपुते यांनी बाजू मांडली.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम