निवडणूक आयोग बरखास्त करा ; उद्धव ठाकरे !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २० फेब्रुवारी २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्यातील ठाकरे गट मोठ्या प्रमाणात अडचणीत आल्याने राजकीय वर्तुळात मोठ मोठे निर्णय होण्याची दाट शक्यता असल्याने आज उद्धव ठाकरे यांनी थेट निवडणूक आयोगाला काही मागण्या केल्या आहे.

निवडणूक आयोग बरखास्त करा. निवडणूक घेऊन निवडणूक आयुक्तांची निवड करावी, अशी मागणी सोमवारी उद्धव ठाकरे यांनी केली. निवडणूक आयोगाला निर्णय आमच्याविरोधात द्यायचा होता, तर शपथपत्रे का भरून घेतली, असा सवालही त्यांनी केला. निवडणूक आयोग म्हणजे सुलतान नाही, अशी तिखट टीका त्यांनी केली. तर देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू असल्याचे म्हणतच भाजपने दगा दिला असेही त्यांनी म्हटले आहे.

देशात चोरांना राजप्रतिष्ठा देण्याचा काळ सुरू आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे. पक्षाचे नाव आणि चिन्ह चोरणे हा संपूर्ण पूर्वनियोजित कट होता. जर आता आपण काही केले नाही तर 2024 ची निवडणूक ही लोकशाहीची शेवटची निवडणूक असेल असे ठाकरेंनी म्हटले आहे. ज्या निवडणूक आयुक्तांनी हा निर्णय दिला त्या तिघांमधील एका आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे, तेच वादग्रस्त असल्याचेही उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्र सरकारच्या मदतीने त्यांना पक्ष आणि चिन्ह मिळू शकले. मात्र, त्यांना ठाकरे नाव मिळणार नाही, ते चोरू शकणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर आता जर आवाज उठवला नाही तर येणाऱ्या काळात देशातील इतर पक्षांसोबत देखील हे होऊ शकते असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय अपेक्षित नव्हते, त्यांनी दिलेला निकाल अयोग्य आहे. आम्ही सुप्रीम कोर्टात या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. घटनेनुसार बाहेर गेलेले सर्व आमदार अपात्र ठरवायला हवे होते. मात्र, केवळ गुंता वाढावा म्हणून निवडणूक आयोगाने घाईत हा निर्णय घेतल्याचा आरोप उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यापुढे म्हणाले की, शिंदे गटात लोक एकत्र बाहेर पडले नाही, सुरूवातील 16 आमदार बाहेर पडले, त्यावर आम्ही अपात्रतेची कारवाई संदर्भात तक्रार केली, यावर सुप्रीम कोर्टात् गेलो आहोत, त्यावर आधी निर्णय व्हायला हवा तर निवडणूक आयोगाविरोधात आम्ही कोर्टात गेलो असून तिथे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल् असा विश्वास उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला आहे. घटनेनुसार तर 40 आमदार अपात्र ठरले पाहिजे, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. निवडणूक आयोग बरखास्त करावा आणि लोकशाही मार्गाने निवडणूक आयोगांच्या आयुक्तांची निवड केली जावी असेही ठाकरेंनी म्हटले आहे. तर मला शरद पवार, ममता बॅनर्जी आणि नितीश कुमार यांच्यासह फोनवरून चर्चा झाली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. पक्षाच्या निधीवर डल्ला मारण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला नाही असे सांगतानाच 2024 नंतर देशात हुकुमशाही येईल असा दावाही त्यांनी केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम