
अभिनेता रितेश देशमुख परिवारास भूखंड प्रकरण भोवणार !
दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र तर मराठी – हिंदी चित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेता- निर्माता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी अभिनेत्री जेनेलिया यांच्या अडचणीत आता वाढ होणार असल्याचे बोलले जात आहे. लातूरमधील भुखंड प्रकरण हे त्यांना भोवणार की काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्याला कारण म्हणजे राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.
अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जेनेलिया देशमुख यांच्यावर गंभीर आरोप भाजपनं केले होते. त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले होते. लातूरमधील 16 उद्योजकांना डावलून देशमुखांना अवघ्या दहा दिवसांत भुखंड मंजूर करण्यात आल्याचा आरोप भाजपनं केला गेला होता. लातूर जिल्हा मध्यवर्ती बॅकेनं त्यांना 116 कोटींचा पुरवठा काही दिवसातच कसा काय केला गेला असा सवालही यानिमित्तानं समोर आला आहे.
रितेश आणि जेनेलिया यांच्या कंपनीला अवघ्या एका महिन्यात 120 कोटींचे कर्ज कसे देण्यात आले आहे. ते कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. एका मराठी वृत्त वाहिनीनं व्हायरल केलेल्या बातमीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांच्यावर वेगवेगळे आरोप करण्यात आल्याचे सांगण्यात आले होते. हाती आलेल्या माहितीनुसार, कमी कालावधीत अवघ्या महिन्याच्या आत त्यांना कर्ज मिळाले. त्या बँकेने आतापर्यत किती जणांना कर्ज दिले? त्या बँकेने देशमुख यांच्या कार्यकर्त्यांना कर्ज दिले आहे असा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांची चौकशी वरिष्ठ पातळीवरुन व्हावेत असा प्रश्न भाजपच्या त्या पदाधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे. एमआयडीसीमध्ये रितेश आणि जेनेलिया यांना जी जमिन देण्यात आली ती कोणत्या निकषांच्या आधारे देण्यात आली आहे असा प्रश्न आता विचारण्यात येतो आहे. यासगळ्या प्रकरणावर रितेश आणि जेनेलिया यांची प्रतिक्रिया काय असणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम