मंगळवारी होणार “स्त्री-शक्तीचा जल्लोष ” ऍड ललिता पाटील यांची पत्रकार परिषदेत दिली माहिती

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२२ । अमळनेर | आबिद शेख | स्वतंत्र भारताच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू या सर्वोच्च पदावर विराजमान झाल्या. प्रथम आदिवासी महिला निवड होणे म्हणजे खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा विजयच आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता.२६) दुपारी तीन ला येथील मराठा मंगल कार्यालयात “जल्लोष स्त्री-शक्तीचा” हा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. तसेच या कार्यक्रमात तालुक्यातील अनुसूचित जाती जमातीतील महिला सरपंचांचा सत्कार करण्यात येणार आहे. यावेळी सर्वपक्षीय महिला पदाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील महिला पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात खान्देशातील महिला पुरुषांसह सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुपच्या अध्यक्षा ऍड ललिता पाटील यांनी आज (ता २३) झालेल्या पत्रकार परिषदेत माहिती दिली. यावेळी ग्रुपच्या सदस्या वसुंधरा लांडगे, बाजार समितीचे संचालक पराग पाटील आदी उपस्थित होते. यावेळी फिनिक्स सोशल अवेअरनेस ग्रुप चा नववा वर्धापन दिवस तसेच ऍड ललिता पाटील यांचा वाढदिवसही साजरा करण्यात येणार आहे.

BJP add

यापूर्वी फिनिक्स ग्रुप तर्फे अनेक सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक उपक्रम राबवण्यात आले आहेत. यात मूक मोर्चा, विद्यार्थ्यांची दत्तक योजना, बालकामगार तसेच महिलांसाठी कार्य, रेड लाईट एरियातील महिलांसाठी कार्य करण्यात आले आहे.तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात संसदेत १३ टक्के महिला खासदार होत्या मात्र आज ही संख्या केवळ नऊ टक्के उरले आहे. प्रशासनातही स्त्रियांची टक्केवारी कमी आहेत अशा या प्रतिकूल परिस्थितीत आपल्या देशाच्या अमृत महोत्सव प्रसंगी आज पहिल्या आदिवासी व द्वितीय महिला राष्ट्रपती निवड होणे ही बाब महात्मा गांधीजींचे स्वप्न पूर्ण करणारी आहे. संविधानाचा खऱ्या अर्थाने फलित झाले आहे.

लवकरच नवनिर्वाचित राष्ट्रपती ची भेट घेणार

महिला राष्ट्रपती झाल्यामुळे आता महिलांना न्याय मिळेल. अमळनेर तालुक्यातील महिला सोबत लवकरच नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांची भेट घेण्यात येणार आहे. यावेळी जिल्ह्यात राहिलेले सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी तसेच तालुक्यातील पाडळसरे धरण पूर्ण करण्यासाठी राष्ट्रपतींना साकडे घालण्यात येईल. यावेळी महिलांच्या विविध समस्यांवरही चर्चा केली जाणार आहे. भविष्यात बहिणाबाई चौधरी, साने गुरुजी, हाशिम प्रेमजी, प्रताप शेठजी या महान व्यक्तींच्या ऐतिहासिक पाऊलखुणा जोपासण्यासाठी भविष्यात फार मोठे कार्य फिनिक्स ग्रुपच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती ऍड ललिता पाटील यांनी दिली.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम