‘महाबळेश्वर’ सोडून ‘या’ ठिकाणी करू शकतात पर्यटन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २४ जुलै २०२३ ।  राज्यात सध्या धो-धो पावसाळा सुरु असून अनेक पर्यटक वेगवेगळ्या ठिकाणी फिरण्यासाठी जात आहेत. पण अनेकदा राज्यातील महाबळेश्वर याठिकाणी पुन्हा पुन्हा जर तुम्ही जावून बोर झाला असाल तर हि बातमी तुमच्यासाठी महत्वाची असणार आहे. ज्यामुळे तुम्हाला नवीन ठिकाण पर्यटनासाठी भेटणार आहे. दापोलीमध्ये तुम्हाला मंदिरे आणि सुंदर समुद्रकिनारे बघायला मिळतील. हे एक छोटेसे हिल स्टेशन आहे, जिथे वर्षभर वातावरण थंड असते. तसेच येथे अनेक किल्ले, गुहा आणि मंदिरे आहेत. इथले शांत वातावरण तुमचे मन प्रसन्न करते. इथले जेवणही खूप चविष्ट आहे, इथे ऐतिहासिक वास्तूही आहेत. जर तुम्ही हिल स्टेशनवर सुट्टी घालवण्याचा प्लॅन करत असाल तर हे ठिकाण तुमच्यासाठी खूप उत्तम ठरू शकते.

येथे कड्यावरचा गणपती नावाचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर दापोलीच्या आंजर्ले गावात बांधले आहे. हे मंदिर खूप मोठे आणि प्राचीन आहे. येथून तुम्ही दाट नारळाच्या बागांचे सौंदर्य, सुवर्णदुर्ग किल्ला आणि अरबी समुद्राच्या दृश्याचा आनंद घेऊ शकता. येथे गरम पाण्याचा झरा देखील वाहतो. ज्या ठिकाणी लोक आंघोळ करतात, तेथे स्त्री-पुरुषांच्या आंघोळीसाठी स्वतंत्र जागाही तयार करण्यात आली आहे. इथे वाहणाऱ्या पाण्याला गंधकाचा वास येतो. म्हणूनच असे म्हणतात की येथे स्नान केल्याने त्वचेचे अनेक आजार बरे होतात. जवळच टेकडीवर शिवमंदिर बांधले आहे. तसेच दापोली-दाभोळ रस्त्यावर पन्हाळेकाजी हे ठिकाण आहे जिथे सुंदर लेणी आहेत, तुम्ही येथे अवश्य भेट द्या. लेण्यांबरोबरच इथे पाहण्यासारखी अनेक शिल्पे आहेत. येथे तुम्ही जंगल नदी आणि वन्य प्राणी देखील पाहू शकता. येथील दृश्य मनाला भिडणारे आहेत. हर्णै येथे कनकदुर्ग आणि सुवर्णदुर्ग असे दोन किल्ले आहेत. हे ठिकाण दापोली पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर आहे. येथील सर्वात जुने लाइट हाऊस हर्णै लॅम्प पोस्ट आहे, तेथून समुद्रकिनारा आणि समुद्रातील जहाजांचे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

येथे कसे पोहचायचे ?
-येथे जाण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार हवाई, रेल्वे किंवा रस्ता निवडू शकता.
-जर तुम्ही विमानाने गेलात तर रत्नागिरीचे देशांतर्गत विमानतळ येथून सर्वात जवळ आहे. दापोली पासून त्याचे अंतर सुमारे 127 किमी आहे.
-रेल्वेने जात असल्यास खेड रेल्वे स्थानकावर उतरावे. हे ठिकाण दापोलीपासून अवघ्या 29 किलोमीटर अंतरावर आहे.
-जर तुम्ही पुणे किंवा मुंबईत रहात असाल तर मुंबईपासून रस्त्याने त्याचे अंतर सुमारे 220 किमी आहे. तर हे ठिकाण पुण्यापासून १८५ किलोमीटर अंतरावर आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम