दिवाळीच्या दिवशी गोठ्याला आग ; शेतकऱ्याचे साहित्याचे नुकसान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ ऑक्टोबर २०२२ । वरगव्हाण गावातील संदीप पाटील यांच्या गुराच्या गोठ्याला रात्री अचानक आग जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वरगव्हाण गावात संदीप संतोष पाटील यांच्या गुरांच्या गोठ्याला रात्री 24 10 2022 रात्री अचानक आग लागली.

सविस्तर वृत असे की वरगव्हाण गावात गावातील मध्य ठिकाणी संदीप संतोष यांचे गुरांचा गोटा असुन एक बैलगाडी व शेती अवजारे ठेवण्यासाठी त्यांच्याकडे त्यांच्या मालकीचा गोठा होता.
प्रथम दर्शी यांच्या कडून प्राथमिक माहिती अशी की त्यांनी गुरांना खाण्यासाठी मक्का व ज्वारी ची कुट्टी साठवली होती, काल अचानक रात्री सोमवारी 11 वाजच्या सुमारास भिषण आग लागली गावकऱ्यांच्या मदतीने आग विझविण्यात आली . त्या आगीत त्यांचे शेतीसाठी लागणारे साहित्य त्यात दोन लाकडी वक्खार, 2 लोखंडी नांगर, गोठ्यासाठी जे पत्री शेड होते त्यांचे पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ऐन दिवाळीच्या दिवशी रात्री त्यांचे नुकसान झाल्यामुळे शासनाकडून मदत मिळावी अशी मागणी संदीप पाटील यांनी केले आहे

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम