
रेल्वेची वाहतूक विस्कळीत ; प्रवाश्यांचे हाल !
दै. बातमीदार । ९ मार्च २०२३ । राज्यात दोन दिवसापासून काही जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवकाळी पाऊस झाल्याने रेल्वे रुळाखाली खड्डा पडल्याने रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाल्याची माहिती समोर येत आहे. मध्य रेल्वेवरील कसाऱ्याहून मुंबईकडे येणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे.
कसारा-उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाडामूळे अप दिशेची वाहतूक पुढील सूचना मिळेपर्यंत ठप्प राहणार आहे. . त्या मार्गावर ट्रॅकमध्ये खड्डा पडल्याने वाहतूक खोळंबली असल्याची माहिती प्रवासी संघटनेचे राजेश घनघाव यांनी दिली. ऐन गर्दीच्या वेळी रेल्वेच्या वाहतुकीवर परिणाम झाल्याने चाकरमान्यांचे हाल होताना दिसत आहे. रूळाखाली असलेला मातीचा भराव अचानक धसल्याने रूळा खाली मोठा खड्डा पडला होता. हा खड्डा तात्पुरता भरण्यात आला आहे. यामुळे कल्याण, मुंबई सीएसएमटीकडे येणाऱ्या लोकल ट्रेनवर परिणाम झाला होता. कसारा-CSMT साठीची 6.57ची लोकल रद्द करण्यात आली होती. तर लांब पल्ल्याच्या गाड्या इगतपुरी स्टेशनवर थांबवण्यात आल्या होत्या.

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम