फडणवीस म्हणता मी पुन्हा येईल ; शिंदेंना राष्ट्रवादीचा खोचक टोला !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  राज्यातील गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सत्ताबदलाचे वारे मोठ्या प्रमाणात वाहू लागले आहे. यातच अजित पवार नॉटरिचेबल होता काय, शरद पवार राजीनामा देता, दोन दिवसात राजीनामा मागे सुद्धा घेतात. यानंतर थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याने सर्वांचे लक्ष वेधलं. मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच, मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. असं वक्तव्य फडणवीसांनी केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. यावर राष्ट्रवादीकडून प्रतिक्रिया देखील उमटल्या आहे.

देवेंद्र फडणवीस यांचे मी पुन्हा येईन म्हणणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी चिंतेची बाब असल्याचं म्हणत राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एकनाथ शिंदे यांना खोचक टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या पुन्हा येईन या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील म्हणाले की, “त्यांच्या या वक्तव्याची आम्हाला भीती नाही. त्यांच्या वक्तव्याची भीती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाटायला पाहिजे. पुन्हा येईन म्हणतायत आणि आलेलेच आहेत. फक्त दोन नंबरला बसलेले आहेत. त्यामुळे ते मी पुन्हा येईन म्हणत असतील आणि शिंदे यांना मुख्यमंत्री पदावरुन बाजूला ढकलून स्वतः बसत असतील तर त्याची चिंता शिंदे यांनी केली पाहिजे.” तसेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत जे 40 वीर गेले आहेत, त्यांनी देखील याची चिंता केली पाहिजे, असंही जयंत पाटील यावेळी म्हणाले आहेत.

काय म्हणाले फडणवीस !
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मी पुन्हा येईन म्हटलं की येतोच. मी कसा येतो हे तुम्हाला देखील माहित आहे. आपलं कुलदैवत नरसिंह आपण कुठूनही प्रगती करतो.” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चंदगडमधील निट्टूर गावात बोलताना हे वक्तव्य केलं होतं.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम