चारचाकी व रिक्षाचा भीषण अपघात : एक ठार तर प्रवासी जखमी !

बातमी शेअर करा...

बातमीदार | १७ ऑगस्ट २०२३ | जळगाव शहरापासून नजीक असलेल्या उमाळा बस स्टॉपनजीक भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने प्रवासी रिक्षास जबर धडक दिल्याने रिक्षा चालकाचा मृत्यू झाला असून प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात अनोळखी चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या उमाळा गावाच्या बस स्थानकानजीक दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकी क्रमांक एम.एच.०२.बी.आर.४३९१ या चारचाकीने प्रवासी रिक्षा एम.एच.१९.व्ही.३७६८ ला जोरदार धडक दिल्याने रिक्षाचालक राजू ओमप्रकाश साहू (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर रिक्षात असलेले प्रवासी यांना दुखापत झाली असून ते रुग्णालयात उपचार घेत आहे. हा अपघात इतका भीषण होता कि रिक्षाचे मोठे नुकसान झाले आहे. याप्रकरणी अनोळखी चारचाकी चालका विरोधात हरीश साहू यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक आणि शेख हे करीत आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम