मी बेबी प्लान करीत होतेय ; राखीने सोडला मौन !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ८ फेब्रुवारी २०२३ । दोन महिन्यापासून अभिनेत्री राखी सावंत तिच्या तिच्या खासगी आयुष्यामुळे नेहमी चर्चेत राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच राखीच्या आईचं निधन झालं. त्यानंतर आता तिच्या वैवाहिक आयुष्यात बऱ्याच समस्या निर्माण झाल्याचं दिसतंय. राखीने नुकतंच तिच्या पतीवर मारहाणीचा आणि विवाहबाह्य संबंध असल्याचा आरोप केला. तिने पती आदिल खान दुर्रानीविरोधात एफआयआरसुद्धा दाखल केली होती. ज्यानंतर ओशिवरा पोलिसांनी आदिलला अटक केली. या सर्व वादादरम्यान मंगळवारी माध्यमांशी बोलताना राखी अचानक बेशुद्ध पडली.

ओशिवरा पोलीस ठाण्याबाहेर राखी माध्यमांशी बोलत होती, तेव्हा ती अचानक बेशुद्ध पडली. तिथे उपस्थित असलेल्यांनी राखीला उचचलं आणि तिला पाणी पाजलं. मात्र राखीची तब्येत जरा जास्तच बिघडली होती. राखीसोबत असलेल्या काही लोकांनी तिला गाडीमध्ये बसवलं आणि तिथून तिला घरी नेण्यात आलं. “मीडिया आणि जगाच्या भीतीने मी सर्वकाही सहन करत राहिली. लोक म्हणतील की दुसरं लग्न आहे आणि हेसुद्धा टिकू शकलं नाही. लोक माझ्यावरच आरोप करतील, म्हणून मी सर्वकाही मुकाट्याने सहन करत गेले. गेल्या आठ-नऊ महिन्यांच्या या संसारात मी आदिलला जवळपास 50 वेळा माफ केलं असेन”, असं राखी म्हणाली.

 

राखीने यावेळी असाही दावा केला की ती आदिलसोबत ‘बेबी प्लॅन’ करत होती. साढे चार महिन्यांपूर्वी बाळासाठी तिचं एक ऑपरेशन झाल्याचंही राखीने सांगितलं. मात्र आदिलने सर्वकाही उद्ध्वस्त केल्याचा आरोप तिने केला. “जर मी तुझ्या जागी असते तर मी तिला कधीच सोडून दिलं असतं, असं त्याची आई त्याला सतत म्हणायची”, असंही राखीने पुढे सांगितलं. लव्ह जिहादच्या प्रश्नावर राखीने साफ नकार दिला. तर तिच्यासोबत असलेली एक व्यक्ती म्हणाली, “यात लव्ह जिहादचा कोणताच अँगल नाही. हे सर्व चुकीचं आहे. ही फक्त एक कौटुंबिक समस्या आहे.”

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम