सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही अॅक्शन घेऊ !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ जुलै २०२३ ।  देशातील मणीपूरमध्ये सुरु असलेल्या वादात नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने सरकारला सुनावले असतांना तो ‘व्हिडिओ व्यथित करणारा आहे. हिंसाचारात महिलांचा शस्त्र म्हणून वापर करणे पूर्णपणे अस्वीकार्य आहे. संविधान आणि मानवाधिकारांचे उल्लंघन आहे. याप्रकरणी सरकार कारवाई करणार नसेल तर आम्ही अॅक्शन घेऊ’, अशा स्पष्ट शब्दांत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सरकारचे कान उपटले.

ही घटना 4 मे रोजीची असली तरी त्याने वास्तव बदलत नाही. हे कदापि खपवून घेतले जाऊ शकत नाही. त्यामुळे सरकारने प्रत्यक्षात पावले उचलून कारवाई करण्याची आवश्यकता आहे. सरकारला त्यासाठी आम्ही थोडा वेळ देत आहोत. मात्र, त्यानंतरही सरकार कारवाई करणार नसेल तर आम्हाला हस्तक्षेप करावा लागेल, असे चंद्रचूड यांनी बजावले. यावर पुढील सुनावणी 28 जुलै रोजी होणार आहे. मे महिन्यात गुन्हा घडल्यानंतर अधिकाऱयांकडून नेमकी काय कारवाई करण्यात आली, याचा तपशील आमच्यापुढे तातडीने यायला हवा. अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होणार नाही, याची खात्रीही सरकारकडून मिळायला हवी, असे सरन्यायाधीशांनी सांगितले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम