![](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2023/06/Batmidar-6-25.jpg)
मंत्री आठवलेंची मागणी : ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद द्या !
दै. बातमीदार । ३० जून २०२३ । भाजपच्या मित्र पक्षांची नुकतीच प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत बैठक झाली असून आगामी मंत्रिमंडळ विस्तारात ‘रिपाइं’ला एक मंत्रीपद देण्याची मागणी केंद्रीय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे.
तसेच जागा वाटपात विधानपरिषदेची एक आणि स्थानिक स्वराज संस्थांच्या आगामी निवडणुकीत योग्य वाटा मागितला असल्याची माहिती आठले यांनी दिली. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत निवडणुकीत आरक्षण रोटेशन पद्धतीने होत आहे. मात्र जिथे दलित वस्ती नाही, तिथे आमचा माणूस निवडून येत नाही. म्हणून आरक्षणाची रोटेशन बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडे करत आहोत, असंही रामदास आठवले म्हणाले. रामदास आठवले म्हणाले, “भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्यावर उत्तर प्रदेश मध्ये झालेला हल्ला दुर्दैवी आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे. या हल्ल्याचा निषेध करतो. राजकीय नेत्यांच्या सुरक्षेची जबाबदारी सरकारची आहे. सरकारने याची सखोल चौकशी करून आरोपींना कठोर शिक्षा करायला हवी.”
देशातील विरोधक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकवटले आहेत. मात्र त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. मोदी लोकप्रिय आणि सक्षम नेते आहेत. आगामी निवडणुकीत 350 च्या वर जागा निवडून येतील आणि मोदी पुन्हा पंतप्रधान होतील. जितके विरोधक एकत्र येतील, मोदींची तितकीच ताकद वाढेल, असे आठवले यांनी सांगितले.
![Jain advt](https://ebatmidar.com/wp-content/uploads/2022/08/IMG_1987.jpg)
दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम