मनसे संपलेला पक्ष ; कॉंग्रेसचे भाई जगतापांचा हल्लाबोल

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २८ नोव्हेबर २०२२ । राज ठाकरे कधी बाहेर पडले नाहीत, फिरले नाहीत, भारत तर सोडा महाराष्ट्रही त्यांनी संपूर्णपणे पाहिला नसेल. मनसे हा संपलेला पक्ष आहे आणि राज ठाकरे यांच्या वेळोवेळी भूमिका बदलत असतात. म्हणून लोकांचा त्यांच्यावर विश्वास नाही आहे. त्यासोबत राज ठाकरे यांनी इतरांच्या मेंदू विषयी बोलण्याआधी स्वतःचे आत्मपरीक्षण करायला पाहिजे. त्यांनीच आता आपला मेंदू भाजप आणि मिंधे सरकारकडे गहाण ठेवला आहे, अशी टीका काँग्रेसने केली आहे.

काल मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांची नक्कल करत त्यांची खिल्ली उडवली. यावर राज ठाकरे सुपारी घेऊन राहुल गांधींवर आरोप करत आहेत. त्यांच्या भाषणातून हेच दिसून आले, असा पलटवार मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी केला.

भाई जगताप म्हणाले, राज ठाकरे हे नकलाकार आहेत. म्हणून त्यांना राहुल गांधी यांच्या आवाजात आर. डी. बर्मनच दिसणार. नाही तरी ते सध्या सिनेमांमध्ये आवाज देण्याचे कामच तर करत आहेत. तसेच, भारत जोडो यात्रेवर टीका करण्याआधी सकाळी लवकर उठा साहेब, असा टोलाही जगताप यांनी राज ठाकरेंना लगावला.

भाई जगताप म्हणाले, आमचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरघोस, उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे राज ठाकरे विचलित झाले आहेत. यात्रेचा परिणाम त्यांच्यावरही झालेला दिसून येतो. त्यामुळेच ते राहुल गांधींवर टीका करत आहेत. एक व्यक्ती चालत संपूर्ण भारत जोडायला निघालेला आहे आणि त्यांना प्रत्येक राज्यात मिळणारा अभूतपूर्व प्रतिसाद, त्यांच्यासोबत सर्व क्षेत्रातील नामवंत व्यक्ती, उद्योजक तसेच सामान्य जनता स्वतःहून जोडले जात आहेत, हे कदाचित राज ठाकरे यांना बघवत नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम