पंतप्रधान नरेंद्र मोदींची विरोधकांवर कडाडून टीका !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २५ जुलै २०२३ ।  देशातील सर्वच विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपला आगामी लोकसभेत पराभूत करण्यासाठी २६ विरोधी पक्ष एकत्र आले आहेत.विरोधकांनी आपल्या आघाडीला ‘इंडिया’ (इंडियन नॅशनल डेव्हलपमेंट इन्क्लुझिव्ह अलायंस) असे नाव दिले आहे. राज्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस(शरद पवार), आणी शिवसेना (ठाकरे) हे तीन मुख्य विरोधी पक्ष सुद्धा या गटामध्ये सामील झाले आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विरोधकांच्या आघाडीवर टीका केली आहे. यावेळी टीका करतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, केवळ इंडिया हे नाव ठेवल्याने काही होत नाही. ईस्ट इंडिया कंपनीमध्येही इंडिया होते आणि इंडियन मुजाहिद्दिनच्या नावातही इंडिया आहे.

पावसाळी अधिवेशनात मणिपूर प्रकरणावरून सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजपच्या संसदीय पक्षाची बैठक झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, भाजप अध्यक्ष जेपी नड्डा आणि सर्व केंद्रीय मंत्री उपस्थित होते. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले कि, विरोधक विखुरलेले आणि हतबल झाले आहेत. त्यांना फार काळ सत्तेवर येण्याची इच्छा नाही, असे विरोधकांच्या वृत्तीवरून दिसत आहे. पावसाळी अधिवेशनातील संसदीय पक्षाची ही पहिलीच बैठक होती.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम