‘कल्पतरुह’ वृक्षारोपण मोहिमेचां ब्रह्माकुमारी संस्था अमळनेर येथे शुभारंभ

बातमी शेअर करा...

पर्यावरण रक्षणासाठी आपन सर्वांनी मिळून काम करणे ही काळाची गरज आहे
आमदार अनिल भाईदास पाटील.

अमळनेर(प्रतिनिधी) ब्रह्मा कुमारी संस्थेने पर्यावरण संरक्षणासाठी एक फेमोठा पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत ‘कल्पतरुह’ वृक्षारोपण मोहिमेद्वारे देशभरात ४० लाख रोपे लावण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. हा अभिनव उपक्रम 5 जूनपासून पर्यावरण दिनी सुरू झाला असून 25 ऑगस्ट पर्यंत सुरू राहणार आहे. ब्रह्मा कुमारींशी संबंधित बंधू आणि भगिनी या मोहिमेत सहभागी होतील आणि सर्वजण 75 दिवस दररोज एक रोप लावतील, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवापासून सुवर्ण भारताच्या दिशेने मोहिमेचा एक भाग म्हणून कल्पतरू मोहीम राबविण्यात येणार आहे.

देशभरातील सेवा केंद्रांवर चालवले जातील-
ब्रह्मा कुमारींच्या देशभरातील 5 हजार सेवा केंद्रे, 50 हजार गीतपाठशाळा, रिट्रीट सेंटर्स, ध्यान केंद्रे आणि सेवा केंद्रांवर कल्पतरुह अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये संस्थेची निष्ठेने सेवा करणाऱ्या ब्रह्माकुमारी भगिनींसोबतच येथील सदस्यही सहभागी होणार आहेत. अभियानांतर्गत ब्रह्माकुमारींच्या आवारात, शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, महानगरपालिका, नगरपरिषद, सामूहिक उद्यान आदी ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

पर्यावरण वाचवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची- आमदार अनिल पाटील.

पर्यावरण रक्षणासाठी आपण सर्वांनी मिळून काम करणे ही काळाची गरज आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने पुढे येऊन एक रोप लावावे आणि ते मोठे होईपर्यंत त्याची काळजी घेण्याची जबाबदारी घ्यावी. निसर्ग वाचवण्यासाठी कल्पतरू मोहीम सुरू करण्यात आली आहे. याअंतर्गत देशभरात 40 लाख रोपे लावण्यात येणार आहेत हा एक चांगला उपक्रम आहे.!

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम