राज्यातील काही भागात पाऊस तर काही ठिकाणी निराशाच !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ९ जुलै २०२३ ।  देशात बदलत्या हवामानामुळे अनेक राज्यातील काही भागात चांगला पाऊस पडत असला तरी काही भागात मात्र निराशा दिसायला मिळत आहे. त्यामुळे बळीराजा चिंतेत सापडला आहे. सध्या कोकण विभागात जोरदार पाऊस सुरु आहे. तसेच मुंबईसह उपनगर, ठाणे, नवी मुंबई परिसरात चांगला पाऊस सुरु आहे. पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यात पावसानं हजेरी लावली आहे. दरम्यान, आजही राज्यातील काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आल आहे. तर पुढच्या 4 ते 5 दिवसात कोकणात मध्यम सरी बरसतील. तिथे पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

कोकणामध्ये सध्या पावसाची संततधार सुरु आहे.कोकणात प्रवास करताना नागमोडी वळणाचे घाट रस्ते आणि त्यात पावसात सह्याद्रीच्या खोऱ्यातून फेसळणारे धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सुरु असलेल्या पावसाच्या संताधारेने प्रवाहीत झालेले धबधबे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यातीलच एक महामार्गावरचा चिपळूण नजीकच्या परशुराम घाटातील सवत-सडा धबधबा. हा धबधबा मुंबई-गोवा महामार्गावर असल्यानं इथे थांबून प्रवास करणारा प्रत्येक प्रवासी मनमुराद आनंद लुटत आहे. त्यातच विकेंड असला की इथे असंख्य पर्यटक या फेसाळणाऱ्या पांढऱ्या शुभ्र धबधब्याचा आनंद लुटतात.

अमरावती जिल्ह्यात जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. 15 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात समाधनकार पाऊस पडला आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना थोडा का होईना दिलासा मिळाला आहे. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट आले होते. मात्र, काल (8 जुलै) झालेल्या पावसामुळं दुबार पेरणीचा संकट टळलं आहे.

जिल्ह्यात सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावल्यानंतर बळीराजा आता सुखावला असून शेतकऱ्यांची पेरणीची लगबग दिसून येत आहे. जिल्ह्यातील सहा तालुक्यात समाधानकारक पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांनी आता पेरणी सुरुवात केली आहे. जिल्ह्यात जवळपास 30 टक्के पेक्षा अधिक पेरणी झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून यावर्षी सर्वाधिक कापसाचे लागवड केली जाणार आहे. तर दुसरीकडे भात लागवडीची तयारी करताना शेतकरी दिसून येत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यातील धरण पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या दमदार पावसामुळे जिल्ह्यातील सात बंधारे पाण्याखाली गेले आहेत. कोल्हापूर (Kolhapur) शहरासाठी अजूनही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. पाणलोट क्षेत्रामध्ये होत असलेल्या पावसामुळे शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड, आणि शिरोळ हे पंचगंगा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम