अजितदादांमुळे शिवसेनेचे आमदार फुटले ; कदमांचा आरोप !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ । महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या टीकेला शिवसेना नेते रामदास कदम यांनी जोरदार प्रत्त्युत्तर दिलं आहे. शिवसेना नेते रामदास कदम म्हणाले, ‘उद्धव ठाकरे यांचे मुख्यमंत्री पद गेले तर अजितदादांचे उपमुख्यमंत्रीपद गेले. त्यामुळेच थयथयाट सुरू आहे.

अजित पवार यांनीच शिवसेनेशी गद्दारी केली. त्यांना आधी जाब विचारा, अशी टीका रामदास कदम यांनी केली. वज्रमूठ सभेत उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेच्या अनुषंगानं शिवसेना नेते रामदास कदम यांना विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. अजित पवार यांच्यामुळेच शिवसेनेचे आमदार फुटले. राष्ट्रवादीच्या आमदारांना जास्त निधी वाटप करून अजित पवार यांनी शिवसेनेसोबत गद्दारी केली आहे. वज्रमूठ सभेत टीका नाही तर थयथयाट केला. टीका करण्यासाठी त्यांच्याकडे मुद्दाच आहे कुठे?
निवडणुका घ्यायला आम्ही केव्हाही तयार आहोत; पण ज्या वेळी तुम्ही सत्तेत होता त्या वेळी निवडणुका का घेतल्या नाहीत, असा सवाल करत दुसऱ्याकडे एक बोट केले तर चार बोटे आपल्याकडे असतात याचे भान अजित पवार यांनी ठेवावे, असा सल्लाही कदम यांनी या वेळी दिला.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम