मोदींच्या हत्येचे वक्तव्य भोवले ; माजी मंत्र्याला पोलिसांनी घेतले ताब्यात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १३ डिसेंबर २०२२ ।  11 डिसेंबर रोजी झालेल्या सभेत पटेरिया म्हणाले होते, ‘लोकशाही वाचवायची असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार राहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हत्येची भाषा करणारे मध्यप्रदेश काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री राजा पटेरिया यांना मंगळवारी पहाटे 5.30 वाजता त्यांच्या घरातून अटक करण्यात आली. पटेरिया त्यांचे मूळ गाव दमोह येथे होते. येथूनच पोलिसांनी त्यांना अटक केली.

त्यांच्या वक्तव्यावर भाजपने हल्लाबोल झाला. गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी सोमवारी पटेरिया यांच्यावर एफआयआर करण्याचे निर्देश दिले. यानंतर पन्ना येथील पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मुख्यमंत्री शिवराज सिंह म्हणाले की, काँग्रेसचा खरा चेहरा उघड झाला आहे. पटेरिया यांनी सोमवारी रात्री आपल्या वक्तव्यावर माफी मागितली. दुसरीकडे काँग्रेस त्यांना नोटीस बजावू शकते. वादग्रस्त व्हिडिओ उजेडात आल्यानंतर माजी मंत्री राजा पटेरिया यांनी आणखी एक व्हिडिओ जारी करून आपल्या विधानाचा विपर्यास करण्यात आल्याचे स्पष्ट केले. ते म्हणाले – व्हायरल झालेला व्हिडिओ कार्ड वितरणाच्या काळातील आहे. त्यातील मोदींच्या हत्येसंबंधीच्या विधानाचा विपर्यास करण्यात येत आहे. मी गांधींना मानणारा व्यक्ती आहे. मी अशा प्रकारचे विधान करू शकत नाही. पटेरिया यांचे हे विधान 11 डिसेंबरचे आहे. पन्ना जिल्ह्यातील मंडलम येथे ते कार्यकर्त्यांशी बोलत होते. तेव्हा ते म्हणाले, ‘मोदी निवडणूक संपवतील. मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे भावी जीवन धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तत्पर राहा. हत्या म्हणजे त्यांना पराभूत करणे आहे.

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ म्हणाले की, ‘व्हिडिओमध्ये जराही सत्यता असेल तर मी अशा विधानांचा तीव्र निषेध करतो. काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता बापूंच्या सत्य-अहिंसेच्या तत्त्वावर चालतो. अहिंसेच्या मार्गाने त्याग करणे हे आपले कर्तव्य आहे. आता काँग्रेस पटेरिया यांना नोटीस बजावू शकते, असे बोलले जात आहे. जवळपास 10 महिन्यांपूर्वीही राजा पटेरिया यांनी एक वादग्रस्त विधान केले होते. तेव्हा ते दमोहच्या रैपुरा ठाण्याच्या प्रभारींशी म्हणाले होते – 2005 पूर्वीपासून या भागातील जमिनीवर कब्जा करणाऱ्या आदिवासींची त्यांच्या जमिनीवरून हकालपट्टी करणे चुकीची आहे. अशा प्रकारे आदिवासींना त्रास देणे, त्यांच्या महिलांशी मारहाण करणे कायद्याने चुकीचे आहे. संसदेतही यासंबंधीचा एक कायदा पारित करण्यात आला आहे. आदिवासींना न्याय मिळाला नाही तर आम्हाला मजबुरीने शस्त्र हाती घ्यावे लागतील.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम