जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला टळला ; एक अटकेत !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ७ मे २०२३ ।  देशातील जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे संभाव्य मोठा दहशतवादी हल्ला टळला आहे. जम्मू काश्मीर पोलिसांनी येथे 5-6 किलो IED जप्त केला आहे. पोलिसांनी त्याच्यासोबत एका दहशतवाद्यालाही अटक केली. इश्फाक अहमद वानी नावाचा दहशतवादी पुलवामाच्या अरिगाम येथील असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

काश्मीर झोन पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. पोलिसांनी सांगितले की, आरोपी इश्फाककडून सुमारे 5-6 किलो आयईडी जप्त करण्यात आला आहे. आरोपी कोठडीत आहे. शेवटच्या दहशतवादी हल्ल्यानंतर मोठ्या प्रमाणात आयईडी जप्त करण्यात आला आहे. आधी पुंछ आणि नंतर राजौरी हल्ल्यात अनेक जवान शहीद झाले. पूंछमध्ये दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनाला लक्ष्य केले. दहशतवाद्यांनी लष्कराच्या वाहनावर ग्रेनेड फेकले होते, त्यामुळे वाहनाला आग लागली. या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर माछिलमध्ये दहशतवाद्यांना पकडण्यासाठी लष्कराने शोधमोहीम सुरू केली.

 

लष्कराचे जवान राजौरीच्या कंडी जंगलात दहशतवाद्यांच्या शोधात गेले, तिथे दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात पाच जवानही शहीद झाले. राजौरीपासून बारामुल्लापर्यंत लष्कर दहशतवाद्यांचा शोध घेत आहे. यादरम्यान लष्कराने 4-5 दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या महिन्यात 22-24 मे रोजी श्रीनगर येथे G20 ची बैठक होणार आहे. हे लक्षात घेऊन लष्कराकडून कारवाई सुरू आहे. रविवारी एकाही दहशतवाद्याशी सामना झाला नसल्याचे लष्कराने सांगितले. लष्कराच्या कारवाईचा आज तिसरा दिवस आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि लष्करप्रमुख मनोज पांडेही शनिवारी येथे पोहोचले. राजौरी येथील 25 इन्फंट्री डिव्हिजनच्या दौऱ्यावर त्यांनी नियंत्रण रेषेच्या सुरक्षेचाही आढावा घेतला. संरक्षणमंत्र्यांसोबत जम्मू-काश्मीरचे एलजी मनोज सिन्हाही उपस्थित होते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम