खोके सरकारने राजीनामा दिलाच पाहिजे ; आदित्य ठाकरे !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३ सप्टेंबर २०२३ | राज्यातील शिंदे व फडणवीस सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रम घेत असून तो कार्यक्रम काय लाढी काठी घेऊन काय असा संतप्त सवाल माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी केला आहे. मुख्यमंत्र्यांना न कळवता पोलिस लाठीचार्ज करतील हे अशक्य आहे, त्यामुळे खोके सरकारमधील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे.

दरम्यान, आदित्य ठाकरे म्हणाले की,सरकारला लाज असेल तर हे राजीनामा देतील, पण राज्यात घटलेल्या अनेक घटना पाहून हे जाणवते की सरकारला लाज वाटत नाही,असा टोला ही त्यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे म्हणाले की, एखाद्या शत्रूवर हल्ला करावा, त्याप्रमाणे हा लाठीमार करण्यात आला आहे. एवढ्या गंभीर मुद्द्यावर आंदोलन होत असताना मुख्यमंत्र्यांना कोणतीही माहिती न देता अशाप्रकारचा लाठीमार होणे, अशक्य असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. या घटनेबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना नक्कीच माहिती असणार. या घटनेचा आपण निषेध करत असून खोके सरकारने राजीनामा देण्याची गरज असल्याचेही आदित्य यांनी ठणकावले. त्यांना थोडीशीही लाज असेल तर त्यांनी तातडीने राजीनामा द्यावा.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम