राज्य अंधारात गेलं ; आदित्य ठाकरेंचा सत्ताधारीवर घणाघात !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ मे २०२३ ।  राज्यातील ठाकरे गटाचे नेते युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी माथेरानचा दौरा केला आहे. यावेळी त्यांनी विविध विषयावर माध्यमाशी चर्चा केली. महाविकास आघाडी ही आपल्या देशाच्या संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र आली आहे.

जिथे जिथे हुकूमशाहीची लक्षणे दिसत आहेत तिथे आम्ही लढत आहोत आणि ही लढाई पुढेही अशीच सुरू राहील असं ते यावेळी म्हणाले आहेत. आदित्य ठाकरे यांनी यावेळी शिवसेना आणि भाजप नेत्यांच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्री कोण होणार यावर सध्या चर्चा नाहीत. महत्त्वाची गोष्ट हीच आहे की, आपलं राज्य अंधारात गेलं आहे. खूप सारे उद्योजक आपल्या राज्यात येत नाहीत, गुंतवणूक होत नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये गुंतवणूक होत होती. महाविकास आघाडीच्या काळात शाश्वत विकास होत होता तसा आता होत नाही. पहिली गोष्ट म्हणजे संविधान रक्षण हा आमचा महत्त्वाचा हेतू आहे आणि आम्ही खुर्चीसाठी एकत्र आलेलो नाही. जसे गद्दार खुर्चीसाठी एकत्र येतात तसे आम्ही येत नाही. अशा शब्दांत त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम