‘या’ कारणाने झाला रेल्वेत गोळीबार !

बातमी शेअर करा...

बातमीदार | ३१ जुलै २०२३  आज पहाते ५ ते ६ वाजेच्या सुमारास जयपूर-मुंबई एक्स्प्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडल्यानंतर राज्यात मोठा हादरा बसला होता. या घटनेमध्ये चौघांचा मृत्यू झाला आहे. हा गोळीबार एका आरपीएफच्या कॉन्स्टेबलनं केला आहे. त्याचं हे टोकाचं पाऊल उचलण्यामागं प्रवाशांसोबत वाद झाल्याचं सांगितलं जात होतं. पण हे कारण नव्हतं तर दुसरं कारण असल्याचं आता पश्चिम रेल्वेच्या पोलीस आयुक्तांनी सांगितलं आहे.

आरपीएफ कॉन्स्टेबलची प्रकृती ठीक नव्हती. त्यामुळं त्यानं स्वतःवरील नियंत्रण गमावलं आणि त्याच्या वाटेत जो कोणी येईल त्याच्यावर त्यानं गोळ्या झाडल्या. यामध्ये पहिल्यांदा त्यानं आपला वरिष्ठ सहाय्यक पोलीस निरिक्षक टिकाराम यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर प्रवाशांवर गोळ्या झाडल्या. प्रवाशांसोबत त्याचा कुठलाही वाद झालेला नव्हता, अशी माहिती माध्यम प्रतिनिधींच्या प्रश्नांना उत्तर देताना रेल्वे पोलीस आयुक्तांनी दिली. जयपूर-मुंबई एक्प्रेसमध्ये सकाळी साडे पाच ते सहा वाजण्याच्या सुमारास गोळीबाराची घटना घडली. चेतन सिंह असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव असून त्यानं त्यानं आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांवर गोळ्या झाडल्या, यामध्ये या चौघांचा मृत्यू झाला. त्यानंतर ट्रेनची चेन पुलिंग करत त्यानं दहिसर जवळ पळून जाण्याचा प्रयत्न केला.

 

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम