
वज्रमूठ सभा फ्लॉप शो ; शिंदे गटातील आमदाराची टीका !
दै. बातमीदार । २ मे २०२३ । राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेले महाविकास आघाडीचे नेते राज्यभर जाहीर सभा घेत सत्ताधारीविरोधात नवी लाट तयार करण्यात जुंपले असतांना शिंदे गटाचे नेते महाविकास आघाडीच्या सभेवर टीका करीत आहे. महाविकास आघाडीची सभा झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेत सभेवर घणाघात साधला.
आ.शिरसाठ म्हणाले कि, उद्धव ठाकरे यांचे भाषण सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण आपापसात गप्पा मारत होते. महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा फ्लॉप शो ठरल्याची टीका शिवसेना प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर केली आहे.
संजय शिरसाट म्हणाले, मी स्वतः उद्धव ठाकरेंची लाईव्ह सभा ऐकली त्यांच्या भाषणात मला कुठेही बेस दिसला नाही. कधी बारसू, कधी पालघर, कधी चीन, कधी सत्यपाल, कधी चीन नक्की ते कशावर बोलले कळले नाही. त्यामुळे माझ्या दृष्टीने हा फ्लॉप शो होता. उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर सत्ता गेल्यानंतरचा तणाव दिसत होता. संजय शिरसाट म्हणाले, यानंतर कदाचित पुन्हा वज्रमुठ सभा होणार नाही, हे मविआच्या नेत्यांनी मनोमन तारले असावे. कदाचित ही आपली शेवटची भेट असेल, असेही नेत्यांना वाटले असेल कारण सभा सुरु असताना अजित पवार, अशोक चव्हाण हे आपसांत गप्पा मारत होते. झाले बाबा एकादाचे आमचे भाषण अशा अविर्भावात ते बोलताना दिसले. महाराष्ट्राचे, शेतकऱ्याचे कुठलेही प्रश्न यात मांडले नाही.
या सभेतून विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. आजच्या सभेतून विशेष अर्थ काढण्याची गरज नाही. मविआतील काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना आता याची जाणीव झालेली आहे की, शिवसेना-भाजपचे सरकार काम करत आहे. त्यांना टोचणे किंवा बाप चोरला, गद्दार बोलणे आता जमणार नाही. यानंतर महाविकास आघाडीची सभा होणार नाही. मविआची सभा ही महाराष्ट्रासाठी होती की, मुंबई महापालिकेसाठी होती?

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा
फेसबुक । ट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम