जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव; ६० दिवसांत दावा न केल्यास हक्क संपणार

बातमी शेअर करा...

जप्त ४५ वाहनांचा होणार लिलाव; ६० दिवसांत दावा न केल्यास हक्क संपणार
जळगाव : शहर पोलिस ठाण्यात विविध गुन्ह्यांमध्ये जप्त करण्यात आलेल्या तसेच चोरीच्या वाहनांपैकी एकूण ४५ वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. संबंधित वाहनांच्या मालकांचा शोध घेऊनही ते निष्पन्न न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या संदर्भात पोलिस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी १३ एप्रिल रोजी जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. जाहीरनाम्यानुसार संबंधित वाहनधारकांनी ६० दिवसांच्या आत संपर्क साधून आपली वाहने ताब्यात घ्यावीत. अन्यथा त्यानंतर वाहनांवर कोणताही हक्क सांगता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम