राज्यघटनेतून नव्या भारताचा उदय : प्रा. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन

बातमी शेअर करा...

राज्यघटनेतून नव्या भारताचा उदय : प्रा. विलास चव्हाण यांचे प्रतिपादन
जळगाव : डॉ. अण्णासाहेब जी. डी. बेंडाळे महिला महाविद्यालय (स्वायत्त) येथे समान संधी केंद्राच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त प्रा. डॉ. विलास चव्हाण यांचे व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आर. के. नारखेडे होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने झाली. यावेळी सामाजिक कार्यासाठी अभेद्य फाउंडेशनच्या अध्यक्षा वैशाली झाल्टे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
“अनंत पैलूंचा सामाजिक योद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर” या विषयावर बोलताना प्रा. चव्हाण यांनी आंबेडकरांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांनी वंचितांना दिशा दिली असल्याचे सांगितले. समतेच्या वाटेवर चालणारे त्यांचे विचार आजही प्रेरणादायी असून भारतीय संविधान देशाचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. नारखेडे यांनी डॉ. आंबेडकर यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकत शिक्षणप्रेम, सामाजिक समतेसाठीचा संघर्ष आणि संविधान निर्मितीतील योगदान यांचा आढावा घेतला. “शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा” हा संदेश आजच्या पिढीसाठी महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमास प्रा. डॉ. व्ही. जे. पाटील, प्रा. डॉ. पी. एन. तायडे यांच्यासह प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन प्रा. दीपक पवार यांनी तर आभार प्रा. योगेश खैरनार यांनी मानले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम