बळीराजा संकटात : अवकाळी पावसाचे थैमान कायम !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ५ मे २०२३ ।  देशात बदलत्या हवामानामुळे बळीराजा चांगलाच संकटात सापडला असून आता पुन्हा एकदा राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं थैमान होणार असल्याचे चित्र दिसू लागले आहे. शेतकऱ्यांची उभी पिकं आडवी होत आहेत. त्यामुळं बळीराजा संकटात सापडला आहे. राज्यातील नंदूरबार, बुलढाणा, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात अवकाळी पावसानं चांगलीच हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसानं हजेरी लावली. त्यामुळं कांदा, मका, भाजीपाला यासह फळपिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

BJP add

बुलढाणा जिल्ह्यात मागील आठवड्यापासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील काही ठिकाणी गारपीट देखील झाली आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या शेतात असलेले कांदा, मका, भाजीपाला, फळबाग या पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली, मेहकर तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला लागला आहे.

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं हाहाकार घातला आहे. शहरासह जिल्ह्यातील बहुताशं भागात अवकाळई पावसानं हजेरी लावली. नवापूर तालुक्यातील खांडबारा रेल्वे बोगद्यात साचले पाणी साचले आहे. पाण्यातून मार्गस्थ होताना वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत आहे. अवकाळी पावसात रेल्वे बोगद्याची ही परिस्थिती आहे. पावसाळ्यात तर या बोगद्याची काय परिस्थिती राहणार? असा सवाल नागरिक उपस्थिक करत आहेत. गेल्या 4 वर्षापासून या ठइकाणी काम सुरुच आहे. अद्यापही काम पूर्ण झालं नाही. खांडबारा रेल्वे बोगदाच्या कामाबाबत अनेक प्रश्न निर्माण केले जात आहेत. कोट्यवधी रुपये खर्च करून रेल्वे प्रशासनाने तयार केलेल्या भुयाराजागी तलाव तयार झाला आहे. दरम्यान, या अवकाळी पावसानं शेती पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम