पाणी आकाशातून आणू का ? मंत्री गुलाबराव पाटील

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १९ ऑक्टोबर २०२२ । पुराच्या पाण्यामुळे नागरिकांना भर पावसाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. असे असताना शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी विधान केले आहे की, “पाणी नाही तर मग आता आकाशातून पाणी आणू का” असं वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी माध्यमांना बोलताना केलं आहे. त्यामुळे त्यांच्यावर सध्या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून तर त्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली अशी टीका विरोधकांकडून केली जात आहे.

BJP add

सध्या पावसाच्या पाण्यामुळे अनेक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत पुराच्या पाण्याखाली गेले आहेत. त्याचबरोबर नद्यांमध्ये विहीरी असल्यामुळे त्यांच्यामध्येही पाणी गेले आहे. पंपही बुडाले आहे. पाणबुड्याही सध्या पाण्याच्या पातळीमुळे काम करत नाहीत. त्यामुळे पाण्याची टंचाई आहेच पण आता काय आकाशातून पाणी टाकतील काय? असं गुलाबराव पाटील बोलताना म्हणाले. तर पाण्याची व्यवस्था त्यांनी करायला पाहिजे अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

“आज स्थानिक स्वराज्य संस्थावर दहा महिन्यापासून प्रशासक नेमले आहेत पण कॅबिनेट मंत्र्यांचा प्रशासकांवर वचक नाही. त्यामुळे जनतेला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे” असं नागरिकांनी सांगितलं आहे. तर गुलाबराव पाटलांच्या काटेरी बोलण्यानंतर जनतेतून रोष व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम