राज्यात आणखी दोन दिवस गारपीटची शक्यता !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । २१ एप्रिल २०२३ ।  राज्यात पहिल्यांदाच उन्हाळ्याच्या महिन्यात पावसाचा अदांज दिला जात असून त्यात गारपीट सुद्धा होत आहे. गुरुवारी झालेल्या पावसाने तापमानात काहीशी घट झालेली पाहायला मिळत आहे. मात्र हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार 23 एप्रिलपर्यंत राज्याच्या विविध भागात पावसाची शक्यता असून येत्या 48 तासांमध्ये मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

राज्यात अवकाळी पावसाचे वातावरण निवळत असले तरी काही ठिकाणी गारपीट होत आहे. शुक्रवारी (दि.21) मध्यरात्रीपासून छत्रपती संभाजीनगर, सातारा, अमरावती, नागपूर, अकोला, बुलडाणा, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली आणि वाशिम जिल्ह्यांत हलका पाऊस तर तुरळक ठिकाणी गारपिटीचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

गुरुवारी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड व कन्नड तालुक्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव येथे गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास एक मोठे बाभळीचे झाड मुळासकट उन्मळून वीज तारांवर पडले. त्यामुळे गावातील वीजपुरवठा खंडित झाला होता. गुरुवारी पुणे, नाशिक, सातारा, अहमदनगर, बीड, जळगाव, हिंगोली, परभणी या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडला.

अवकाळीने ग्रस्त असलेला बळीराजा आणखीनच कोलमडून पडला आहे. पावसासह वाढता उकाडाही दिंवसेंदिवस असह्य होत चालला आहे. विदर्भात तर मे महिना सुरु होण्याच्या आधीच उकाडा वाढला आहे. कोकणासह मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे भागात तापमानाचा आकडा वाढलेला पाहायला मिळेल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. एकीकडे वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. तर दुसरीकडे तापमानातही मोठी वाढ होताना दिसून येत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये उन्हाचा पारा 42 अंशापार गेल्याचे दिसून येत आहे. महिनाभरात मान्सूनला पोषक परिस्थिती तयार होऊ शकते. मात्र अजून अवकाळीनेच राज्यातून काढता पाय घेतलेला नाही.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम