उन्हाळ्यात माठातील पाणी थंड होण्यासाठी हे करा !

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । ६ एप्रिल २०२३ ।  सध्या देशभर उन्हाळा सुरु झाला असून राज्यात मोठ्या प्रमाणात उन्हाचा तडाखाच सुरु झाला आहे. चक्क यासाठी प्रशासनाने दखल घेत लहान मुलाच्या शाळेचे वेळापत्रक देखील बदलविले आहे. उन्हाळा म्हटलं की वाढत्या तापमानाने आपल्या जीवाची काहिली होते. वाढती उष्णता, गरमी यामुळे आपल्याला उन्हाळ्यात सतत तहान लागते. उन्हाळ्यात ही तहान भागवण्यासाठी आपण पाणी, ताक, फळांचे रस, सरबत असे अनेक द्रव पदार्थ पित असतो.

बऱ्याचदा उन्हांतून फिरुन आल्यानंतर आपल्याला भरपूर तहान लागते अशावेळी आपण फ्रिजमधील किंवा मातीच्या माठातील गार पाणी पिणे पसंत करतो. परंतु फ्रिजमधील गार पाणी प्यायल्यामुळे आपल्याला सर्दी, खोकला, घसा बसणे असे अनेक आजार होऊ शकतात. फ्रिजमधील गार पाणी पिण्याचे अनेक दुष्परिणाम आहेत. फ्रिजमधील गार पाणी पिण्यापेक्षा माठातील गार पाणी पिणे केव्हाही उत्तम ठरते.

कितीही जग पुढे गेले असले तरीही काही गोष्टी या ‘जुनं ते सोनं’ असं म्हणून आपण त्याचा वापर करतच असतो, त्यातील एक गोष्ट म्हणजे ‘मातीचा माठ’. उन्हाळ्याच्या दिवसांत माठातलं पाणी प्यायल्याने जी मनःशांती होते ती फ्रिजमधले पाणी प्यायल्याने होते नाही. आपल्या पूर्वजांनी मातीच महत्व जाणलं होत म्हणूनच त्यांनी माठाची निर्मिती केली होती. अजूनही बऱ्याचशा घरात पाणी पिण्यासाठी माठाचा वापर केला जातो. जेव्हा आपण फ्रिजमधील पाणी पितो तेव्हा तहान भागते, पण ती तात्पुरती असते. जर आपण माठातील पाणी प्यायलो, तर मातीचा हलकासा सुगंध आणि माठातील नैसर्गिक गार पाणी याने तहान नक्कीच भागते. मातीच्या माठातील पाणी गार असते परंतु उन्हाळ्याच्या दिवसांत माठातील पाणी अजून गार करण्याची एक सोपी ट्रिक लक्षात ठेवू

नक्की काय करता येऊ शकते?

१. सर्वप्रथम, संपूर्णपणे मातीपासून बनलेला एक मातीचा माठ घ्यावा, तो स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा. आपण विकत आणलेला मातीचा माठ हा खरंच मातीचा आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी माठ चमच्याने वाजवून पाहावा.

२. आता आपण ज्या स्टँडवर मातीचा माठ ठेवतो त्या स्टँडवर मातीचा माठ ठेवण्याआधी मातीची छोटीशी कुंडी ठेवावी. ही कुंडी मातीने भरलेली असावी. मातीने भरलेली कुंडी ठेवल्यानंतर माती भिजून ओली होईल इतके पाणी त्यात घालावे. त्यानंतर या कुंडीवर आपला पाण्याने भरलेला मातीचा माठ अलगद ठेवून द्यावा.

३. त्यानंतर एक कॉटनचा टॉवेल किंवा सुती कापड घेऊन ते संपूर्णपणे पाण्याने भिजवून घ्यावे. हे भिजवून घेतलेले कापड माठाच्या बाहेरील बाजूने माठाला संपूर्णपणे गुंडाळून घ्यावे. यामुळे माठातील पाणी जास्त काळासाठी थंडगार राहते.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम