स्मार्टफोन वापराचे तंत्र समजून घेणे गरजेचे – डॉ. वडनेरे

रोटरीतर्फे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` व्याख्यान

बातमी शेअर करा...

दै. बातमीदार । १७ सप्टेंबर २०२२ आज सर्वांच्या हातात स्मार्टफोन आलेला आहे. स्मार्टफोन प्रमुख संपर्क साधन जरी असले तरी त्याचा अविवेकी वापर दुधारी तलवारीसारखा असल्याने वापरकर्ताच संकटात सापडण्याचे प्रमाणे सर्वाधिक आहे, असे प्रतिपादन डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी केले.

रोटरी क्लब, रोटरेक्ट क्लब आणि रोटरेक्ट क्लब, आयएमआर जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रोटरी हॉल, गणपती येथे `सायबर सुरक्षा : काल, आज आणि उद्या` विषयावर व्याख्यानाचे आयोजन झाले. या व्याख्यानात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथील डॉ. सोमनाथ वडनेरे यांनी मुख्य विषयावर मार्गदर्शन केले. व्याख्यानाच्या व्यासपीठावर रोटरी क्लब जळगावचे अध्यक्ष राजेश वेद, सचिव मनोज जोशी, समिती अध्यक्ष जयेश ठाकूर उपस्थित होते.

आपल्या संबोधनात डॉ. वडनेरे यांनी वर्तमान काळातील सायबर सुरक्षेच्या महत्वाच्या मुद्यांवर मार्गदर्शन केले त्यात स्मार्टफोन, विविध ऑनलाईन पेमेंट साधने, सोशल मीडिया, नेट बँकिग सुरक्षा आदी मुद्यांचा समावेश होता.

स्मार्टफोन मित्र आणि शत्रूही :
आज प्रत्येकाच्या हातातील स्मार्टफोनने महत्वाचे स्थान प्राप्त केले आहे. घरगुती वापरकत्र्यांपासून विद्यार्थी, व्यावसायिक, विविध क्षेत्रातील सर्वच व्यक्ति स्मार्ट फोन वापरतात. परंतु अलीकडे त्याच्या अतिविवेकी वापरामुळे अनेक सामाजिक प्रश्नही निर्माण झाले आहे.

`तंत्रस्नेही` बरोबर `तंत्रसमज` येणे आवश्यक :
सायबर सुरक्षाबाबत वर्तमानपत्र, सोशल मीडियात प्रबोधन होऊनही सायबर गुन्ह्यास बळी पडण्याचे प्रमाण जास्त असण्याचे कारण तंत्रस्नेही सर्वच बनलेत परंतु तंत्रज्ञान वापराचे जुजबी आणि विवेकी कौशल्य, जागरुकता समाजात येणे महत्वाचे आहे. सायबर गुन्ह्यात बळी पडण्याचे मुख्य कारण तंत्रज्ञान वापरणे पण तंत्र समजवून न घेणे हेच होय.

घातक सवय : ऑटो कॉल रेकॉर्डिग :
स्मार्टफोन वर `बाबूजी समजकर बोलना` ही म्हणण्याची वेळ आता आली आहे. पूर्वी दूरध्वनी विभागाकडेच कॉल रेकार्डिंग ही अधिकृत सुविधा होती. मात्र आता स्मार्टफोनमध्येच ऑटो कॉल रेकॉर्डिंग ही सुविधा आल्यानंतर त्याचा स्वैर वापर होऊ लागला आहे. यामुळे एखाद्याला जीवनातून आयुष्यातून संपविण्यापर्यंतच्या घटना घडत आहेत. मुळात कॉल रेकॉर्डिंग आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंग या दोन्ही सवयी घातक असून आपला स्मार्टफोन हरविल्यास त्यातील कॉल रेकॉर्डिंगचा दुरुपयोग होऊ शकतो ही गंभीर बाब आहे.

सायबर गुन्ह्यास बळी पडणारे सुशिक्षित जास्त :
वर्तमानपत्रातून आपण सायबर गुन्ह्यास बळी पडणा·यांच्या घटना वाचतो मात्र तरही सुशिक्षित लोक यास जास्त बळी पडण्याचे कारण म्हणजे एक तर अतिलोभामुळे झटपट श्रीमंत होण्याचा कल आणि दुसरे म्हणजे तंत्रज्ञानास समजून न घेण्याची उदासीनता होय.

टेक्नो कौन्सीलरची मागणी वाढणार :
मानसिक स्वास्थ्यासाठी आज समुपदेशक अर्थात कौन्सीलरची मदत घेणा·यांची संख्या लक्षणीय आहे. मात्र भविष्यात त्यापेक्षाही अधिक संख्या टेक्नो कौन्सिलर यांची लागणार आहे. ही संकल्पना माहिती आणि तंत्रज्ञानाच्या साधनांनी मानसिक शांती, स्वास्थ्य हिरावून बसलेले शेकडो व्यक्ति आहेत त्यांना मार्गदर्शनासाठी वेगाने पुढे येत आहे.

याप्रसंगी रोटरी क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब जळगाव, रोटरेक्ट क्लब, आयएमआर जळगावचे सदस्य आणि नागरिक उपस्थित होते. तसेच आयोजित कारण्यात आलेल्या या व्याख्यानात रोटरी बांधवांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेश वेद तर आभारप्रदर्शन जयेश ठाकूर यांनी केले.

बातमी शेअर करा...
Jain advt

दै. बातमीदार चे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा

फेसबुकट्विटर ।युट्युब | इंस्टाग्राम | गुगल न्यूज | टेलिग्राम